Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग, भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक जिल्ह्यात तसंच कल्याणमध्ये सभा
मुंबईत कोसळलेल्या फलकाच्या सुट्या भागांसह राडारोडा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप झालं असल्याची आमदार वैभव नाईक यांची तक्रार
आणि
परभणी जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पाथरी तालुक्यात केळी आणि आंबा पिकांचं मोठं नुकसान
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात येत्या २० तारखेला मतदान होणार आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं सभा झाली. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्राचारार्थ झालेल्या या सभेत पंतप्रधानांनी, विरोधी पक्षांवर कडाडून टिका केली.
नाशिक मधल्या कांद्याच्या प्रश्नावर बोलताना मोदी यांनी, केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक करण्याची योजना सुरु केल्याचं सांगितलं. कांद्यासह इतर पिकांसाठी सरकार ऑपरेशन ग्रीन राबवत असून, कांद्याच्या वाहतुकीसाठी अनुदान दिलं जाईल, असं ते म्हणाले.
कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा होत असून, यानंतर ते मुंबईत घाटकोपर इथं रोड शो करणार आहेत.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
मुंबईतल्या घाटकोपर मध्ये छेडा नगर परिसरात कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले आहेत. या सुट्या भागांसह राडारोडा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसंच बाह्य यंत्रणा आपसात समन्वय राखून अव्याहतपणे कार्यरत आहेत. परवा १३ तारखेला झालेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, तर ७४ जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं.
****
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज सकाळी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारी, अडीच हजार मेट्रीक टन वजनाची दुसरी महाकाय तुळई, यशस्वीपणे स्थापन केली. खुल्या समुद्रात लाटांचा अंदाज घेत मोठ्या तराफ्याच्या मदतीने ही तुळई जोडली गेली. पहाटे तीन वाजेपासून तुळई टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रवाहकीय हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही दुसरी तुळई आधी बसवलेल्या पहिल्या तुळईकडे सरकवण्यात आली. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत.
****
भारतीय वायुसेनेच्या स्वदेश निर्मित भीष्म क्यूब या मोबाईल रुग्णालयाचं आज आग्रा इथं यशस्वी परिक्षण झालं. हे अत्याधुनिक मोबाईल रुग्णालय भारत हेल्थ इनिशिएटीव फॉर सहयोग, हित अँड मैत्री या भव्य उपक्रमाचा एक भाग आहे. या रुग्णालयामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि तत्पर आरोग्यसेवा देता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. या मोबाईल रुग्णालयात एकावेळी जवळपास २०० रुग्णांवर उपचार करता येतील. वॉटरप्रूफ, कमी वजनाचं आणि अत्याधुनिक असं हे मोबाईल रुग्णालय आपत्कालीन परिस्थितीतल्या वैद्यकीय सेवेसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून उभारण्यात आलं आहे.
****
राजस्थानमधल्या नीमका थाना जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातल्या १५ कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आज यश आलं आहे. या १५ जणांपैकी एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. काल रात्री कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळे हे सर्वजण खाणीत ५७७ मीटर खोलवर अडकले होते.
****
वैद्यकीय क्षेत्रात संशोधन, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यासाठी नवी दिल्लीच्या एम्स या संस्थेनं युनिव्हर्सिटी ऑफ बोल्टन इन्स्टिटयूट ऑफ मेडिसिन या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, शैक्षणिक परिषदा, एकत्रित पदवी अभ्यासक्रम राबवणं असे उपक्रम आता या दोन्ही संस्था एकत्रितपणे करतील.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आज भारतीय नागरिकत्व मिळालेल्या १४ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी या १४ जणांना नवी दिल्लीत नागरिकत्व प्रमाणपत्र हस्तांतरित केलं. २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान तसंच बांग्लादेशातून भारतात स्थलांतरित झालेल्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठीच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना ११ मार्च २०२४ रोजी जारी झाली होती.
****
6 जी तंत्रज्ञानात देशाची डिजिटल अर्थव्यवस्था सशक्त बनवण्याची तसंच उत्पादकता वाढवण्याची क्षमता असल्याचं, इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस कृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारत 6 जी २०२४ या संमेलनात आज ते बोलत होते. पहिल्या औद्योगिक क्रांतीप्रमाणेच 6 जी तंत्रज्ञान विकासाचा परिणाम असेल असं ते म्हणाले. 6 जी तंत्रज्ञान मोठ्या डेटा उत्पादनाला चालना देईल, तसंच आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्याकरता आर्टीफिशियल इंटिलीजन्स ला उत्कृष्ट बनवण्यासाठी संगणकाला योग्य ती माहिती पुरवेल असं ते यावेळी म्हणाले. उत्तम डिजिटल संरचनेसाठी सहकार्य करण्याच्या दृष्टीनं एस कृष्णन यांनी या संमेलनात उद्योजकांना प्रेरित केलं.
****
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज एका पोलीस निरीक्षकाचं वाहन निशाणा साधून स्फोटकाद्वारे उडवलं. या घटनेत वाहनाचं मोठं नुकसान झालं असून, सुदैवाने वाहनात बसलेले पोलीस निरीक्षक आणि शिपाई पूर्ण सुरक्षित राहिले.
****
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप झालं असल्याची तक्रार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवडणुकीत नारायण राणे यांनाच मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचं निदर्शनास आलं असल्याचं वैभव नाईक यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात येत्या सोमवारी २० मे रोजी मतदान होणार असून, त्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरवण्यात येणार आहेत.
****
��ुंबईत घाटकोपर इथं जाहिरात फलक कोसळल्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातले विनापरवानगी, अनधिकृत फलक तत्काळ काढून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी, लातूर शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, अवकाळी पाऊस, वादळाच्या काळात जाहिरात फलकामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, तसंच अशा प्रसंगी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अनधिकृत एच.टी.बी.टी कापुस बियाणे खरेदी आणि लागवड करु नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केलं आहे. गुणवत्ता आणि दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी आणि बियाणे विक्री परवानाधारकांकडूनच कापूस बी.टी.बियाणे पावतीसह खरेदी करावे, असं त्यांनी सांगितलं आहे. फसवणूक तसंच बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पाथरी तालुक्यातल्या बोरगव्हाण शिवारासह अनेक ठिकाणी केळी आणि आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याच्या मागणीचं निवेदन पाथरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आज देण्यात आलं.
दरम्यान, उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल चार संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्य असेल.
****
0 notes
प्रेफरन्स शेअर्स [PREFRENCE SHARES]
आता आपल्याला शेअर्स - शेअरमार्केट हे शब्द काही परके राहिलेले नाहीत. भले आपण सरळ सरळ शेअर्समध्ये पैसे गुंतवायला घाबरत असलो तरीही ते काही आता रॉकेट सायन्ससारखे राहिलेले नाही. गेल्या अनेक वर्षांत त्यातील व्यवहार अनेक पटीत वाढलेले आहेत. आपल्याला काही शेअर्समधील गुंतवणुकीबाबत अधिक काही जाणून घ्यायचे नाही. तरही तुम्हाला प्रेफरन्स शेअर्स - प्राधान्य शेअर्सबाबत काही माहिती असणे अगत्याचे आहे. कारण हा एक शेअर्सचा प्रकार महागणपती मल्टिस्टेटच्या माध्यमातून अधिकाधिक लोकप्रिय होतांना दिसतो आहे.
शेअर्स म्हणजेच समभाग हे मुख्यत: दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे साधे शेअर्स –जे नियमितपणे पब्लिक इश्युजद्वारे विक्रीला काढलेले असतात आणि दुसरे म्हणजे प्रेफरन्स शेअर्स. ह्यातील प्रेफरन्स हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला अन्य शेअरहोल्डरपेक्षा प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य मिळू शकते. कंपनीला झालेल्या नफ्यातही या भागधारकांना अग्रक्रम मिळतो. कंपनीच्या आर्थिक दिवाळखोरीत साध्या शेअर्सपेक्षा प्राधान्य शेअर्स हे महत्वाचे असतात. कारण कंपनीच्या आर्थिक व्यवहारांत काही गडबड-घोटाळा झाल्यास बाकीचे शेअर्स बाजूला ठेवले जातात आणि प्रेफरन्स शेअर्स असलेल्यांना प्राधान्य दिले जाऊन त्यांना त्यांच्या शेअर्सची किंमत मिळू शकते.
महागणपती मल्टिस्टेटने नेमके कोणते साधन आणलेले आहे ? आपण असे प्राधान्य शेअर्स घेतले तर नेमका किती व कसा लाभ होणार? शेअर्सवर लाभांश मिळतो हे तर तुम्हाला ठावूक असेलच. आपल्यालाही लाभांश मिळू शकतो.शिवाय हे शेअर्स हे बऱ्यापैकी लिक्विड साधन म्हणून मानले जातात. कारण हे विकण्यासाठी असलेली प्रक्रिया तशी सुलभ असते. वेळखाऊ किंवा प्रोसिजरसाठी अधिक वेळ दवडला जात नाही. आपल्या आकस्मिक व तांतडीच्या गरजेसाठी अतिशय लवचिक असलेले प्राधान्य शेअर्स तात्काळ विकून आपल्याहाती त्याचे मूल्य मिळू शकते.
शेअरबाजारात प्रत्यक्ष व्यवहार न करता, त्यातून गुंतवणुकीची अस्थिरता टाळून जर का आपणास स्थिर व नफादायी गुंतवणूक करायची असेल तर क्रेडीट सोसायटी – पतपेढीचे प्राधान्य शेअर्स हा एक पर्याय आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. असे हे साधन बाजारात आणण्यात महागणपती मल्टिस्टेटने चांगलाच अग्रक्रम पटकावलेला आहे. आपल्या खातेदारांत असे हे अभिनव गुंतवणूक साधन हे कमालीचे लोकप्रिय होतांना दिसते आहे. पतपेढीचे असे शेअर्स घेऊन तुम्ही-आम्ही एका अर्थाने त्यापतपेढीला आर्थिकदृष्ट्या सबळच करत असतो. हाही एक सामाजिक – आर्थिक हेतू लक्षांत ठेवलात तर प्रेफरन्स शेअर्स घेण्याची तुम्हालाही उर्मी येईल. एका वेगळ्या प्रकारे आपण पैसे गुंतवतो आहोत व लाभांशसह अन्य लाभ घेण्यास आपण पात्र ठरतो आहोत. हेच तुम्हाला महागणपती मल्टिस्टेटमार्फत प्रेफरन्स शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यावर कळू शकेल. मग वाट कसली पाहता? एक अभिनव साधन म्हणून आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये महागणपतीचे प्रेफरन्स शेअर्स असायलाच हवेत, नाही का?
आजच महागणपती मल्टिस्टेटच्या जवळच्या शाखेत जाऊन योजनेची माहिती घ्या.
अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता : 1800 210 2002
1 note
·
View note