शिक्षिका ममता बंडाठे यांच्या मार्गदर्शनाला यश | सैनिकी शाळा व नवोदय परीक्षेत 6 विद्यार्थ्यांचे सुयश
तिरोडा : असीम सराफ सेन्ट्रल अकाडेमी तिरोडा येथील शिक्षिका ममता आनंद बंडाठे यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिकी शाळा व नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेबाबत यथायोग्य मार्गदर्शन केले व त्याबाबत शिकविले. त्यामुळे सदर परीक्षांमध्ये 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अर्णव मनोजकुमार बडोले (मेरिटोरिअस पब्लिक स्कूल), पार्श्व गजेंद्र ठोंबरे (असीम सराफ सेन्ट्रल…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
'नमो महारोजगार' मेळाव्यातून आतापर्यंत राज्यातल्या २५ हजार युवकांना रोजगार मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
देशातल्या तेहतीस साखर कारखान्यांच्या एक हजार ३७८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी करण्यास मान्यता
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा खासदार इम्तियाज जलिल यांचा आरोप
आणि
राज्यात उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
****
'नमो महारोजगार' मेळाव्यातून आतापर्यंत राज्यातल्या २५ हजार युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बारामती इथं आज नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे, हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विविध विकासकामांचंही लोकार्पण करण्यात आलं. रोजगार मेळावा आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमांना, राज्यात फार चांगली लोकप्रियता मिळाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. एका छताखाली नागरिकांना सर्व योजनांचा लाभ देण्याच्या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारनं रोजगाराच्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या मेळाव्यात पाच हजारांवर उमेदवारांनी नोंदणी केली असून, २५४ कंपन्या रोजगार देणार आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रसंगी, सरकारच्या विविध उप्रकमांची माहिती दिली. पुढचा रोजगार मेळावा ठाणे इथं सहा आणि सात मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
बारामती तालुक्यातल्या बऱ्हाणपूर इथं नव्यानं निर्मित पोलीस उपमुख्यालयाचं तसंच अन्य विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण देखील, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं.
****
पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या वढु बुद्रुक इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ विकासकामांचं भूमिपूजन देखील आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
दरम्यान, आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडी इथं भराडी देवी यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी देवीचं दर्शन घेतलं. राज्यात शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखी आणि संपन्न करण्याचं, भराडी देवी चरणी साकडं घातल्याचं, त्यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
देशातल्या तेहतीस साखर कारख��न्यांच्या, एक हजार ३७८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी करण्याला मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे ६१९ कोटी रुपयांचं अतिरिक्त व्याज पूर्णपणे माफ होणार आहे. या एकूण थकीत कर्जामध्ये महाराष्ट्रातल्या कारखान्यांचं जवळपास ८६१ कोटी रुपये कर्ज थकीत होतं. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने याबाबत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
****
निर्यातबंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच भारतातून समुद्रमार्गे अमेरिकेला डाळिंबं निर्यात करण्यात आले. १४ मेट्रिक टन डाळिंब भरलेला कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट टस्ट्र नाव्हा शेवा इथून समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क या पोर्टसाठी आज रवाना करण्यात आला असल्याची माहिती पणन विभागाने दिली आहे. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला.
****
मानवी संबंधांचं व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपूर इथं आज विदर्भ मॅनेजमेंट संघटनेच्या वतीनं आयोजित, सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. दीर्घकाळ यशस्वी राहायचं असल्यास, नेतृत्वगुण, वागणूक, विश्वासार्हता, सकारात्मकता आणि आत्मविश्वास, हे मूल्य अधिक महत्त्वाची असतात, असं त्यांनी यावेळी सांगितलं. उत्तम व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्या प्रदेशातली क्षमता ओळखून, त्यांचं संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.
****
सकारात्मक चिंतनासह वर्तणूकशास्त्राकडे लक्ष देण्याची गरज, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. नाशिक इथं आज भोसला सैनिकी शाळा परिसरातल्या, डॉ.मुंजे इन्टीट्युटच्या बोधचिन्हाचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. संस्काराबरोबरच वर्तुणूकशास्त्रातल्या घटकांना प्राधान्य देत, संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचं ध्येय समोर ठेवायला हवं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
शहरी सहकारी बँक संघटना अंतर्गत, राष्ट्रीय शहरी सहकारी पत आणि विकास महामंडळाचा, आज केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला. या संघटनेच्या स्थापनेमुळे, आत्मनिर्भर भारताची सहकारातून समृद्धीकडे वाटचाल होण्यास मदत होणार आहे. शहरी सहकारी बॅंकांमुळे देशाचा सर्वसमावेशक आर्थिक विकास शक्य होणार असल्याचं सांगत, बँकिंग क्षेत्राचा विकास आणि आधुनिकीकरणावर भर द्यावा, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं.
****
यंदाच्या उन्हाळ्यात अल-निनो स्थिती कायम राहण्याची शक्यता, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत, तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मात्र फक्त वायव्य, ईशान्य, मध्य आणि द्वीपकल्पीय भारतात तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी केलं आहे,
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप, खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक वसाहतीत विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझ च्या अंतर्गत एका बड्या कंपनीनं २००७ मध्ये २३२ एकर भुखंड संपादित केला होता. त्यावर मोठा प्रकल्प उभारण्यात येणार होता मात्र आता या भूखंडाची परस्पर विक्री होत असल्याचं खासदार जलिल यांनी सांगितलं. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांनी, औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं.
****
राज्यात उद्या तीन मार्च रोजी, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत, सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याकरीता ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्र, नांदेड जिल्ह्यात दोन हजार ७६७, तर लातूर शहरात एकूण २१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरत्या पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. जालना इथं दोन लाख ५३ हजार ६५३ बालकांचं लसीकरण करण्यासाठी, एक हजार ५२१ बुथ तसंच १०९ फिरत्या पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
चंद्रपूर इथं ताडोबा महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी, ६५ हजार ७२४ वृक्ष रोपट्यांच्या माध्यमातून भारत माता हा शब्द साकारण्यात आला असून, याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. राज्यातला सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प आणि २०० पेक्षा जास्त वाघांचं निवासस्थान असलेल्या ताडोबा व्याघ्र तीन दिवसीय महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी, ६३५ क्विंटल साखरेचं आयतन मंजूर करण्यात आलं आहे. २०२३ या वर्षातल्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांसाठी प्रति शिधापत्रिका एक किलो साखर, संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरीत केली जाईल.
****
नांदेडमध्ये येत्या पाच मार्चला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणं, गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणं आणि उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीला चालना देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचं आवाहन, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे.
परभणी इथंही येत्या पाच मार्च रोजी, जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे.
****
हिंगोली शहरात जलेश्वर तलाव परिसरातलं अतिक्रमण आज काढण्यात आलं. या तलाव परिसराचं आता सौंदर्यीकरणं करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना २९ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावण्यात आला होत्या, त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. याठिकाणी चारशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
****
अहमदनगर इथं दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचं उद्धाटन, आज आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं. तत्पूर्वी ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली होती. या ग्रंथोत्सवात राज्यातल्या विविध प्रकाशन संस्था सहभागी झाल्या आहेत.
****
0 notes
Military Schools: सैनिकी शाळांसंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
Military Schools: सैनिकी शाळांसंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
Military Schools: सैनिकी शाळांसंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
Military Schools: राज्य सरकारने १९९६ मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सद्यस्थितीत राज्यात ३८ अनुदानित सैनिकी शाळा आहेत. या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने घट होत आहे. या शाळांमधून ‘एनडीए’मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या काही…
View On WordPress
0 notes
सशस्त्र दलात मुलींच्या सहभागासाठी १०० नवीन शाळा सुरू करणार, राजनाथ सिंह यांची घोषणा - military school for girls 100 new schools to be set up for participation of girls in armed forces
सशस्त्र दलात मुलींच्या सहभागासाठी १०० नवीन शाळा सुरू करणार, राजनाथ सिंह यांची घोषणा – military school for girls 100 new schools to be set up for participation of girls in armed forces
हायलाइट्स:
१०० नवीन सैनिकी शाळा सुरु करणार
सशस्त्र दलात मुलींचा सहभाग वाढविणार
राजनाथ सिंह यांनी केली घोषणा
सशस्त्र दलात (Armed Forces)मुलींच्या अधिक सहभागासाठी १०० नवीन सैनिक शाळा (Military school ) स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defencee Minister Rajnath Singh) यांनी केली. सैनिक शाळांवरील वेबिनारमध्ये (Military school Webinar) ते बोलत होते. १०० नवीन सैनिक…
View On WordPress
0 notes
मित्राच्या मुलाच्या निवडीचा पोलीस उपनिरीक्षक सिद्धे यांनी केला पेढे वाटून आंनद साजरा
मित्राच्या मुलाच्या निवडीचा पोलीस उपनिरीक्षक सिद्धे यांनी केला पेढे वाटून आंनद साजरा
—————————————————–
गौतम बचुटे/केज :- साळेगाव ता. केज येथील विद्यार्थी चि. उत्कर्ष ओव्हाळ याची चंद्रपूर येथील सैनिकी शाळा ( मिलिटरी स्कुल) साठी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्या निमित्त उत्तम ओव्हाळ यांचे वर्गमित्र आणि केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी पेढे वाटून आंनद साजरा केला.
या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील उत्तम ओव्हाळ व केज…
View On WordPress
0 notes
विद्यावृत - माहे मार्च/एप्रिल २०२०
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी जि नांदेड
-----------------------------------------------------------------------------------------------------
विज्ञान जत्रेत बालवैज्ञानिकांचा उत्साह- प्रकल्प सादरीकरणातून संशोधनवृतीची अनुभूति
विज्ञान हा एक असा दिवा आहे की जो कुठेही पेटवल्यावर ज्ञानाचा प्रकाश पसरतो. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला संधी मिळाल्यास कल्पना आणि जिज्ञासू वृतीमधून नवनिर्मिती कशी होते, हे क्षेत्रिय बालविज्ञान जत्रेतून दिसून आले. संस्थेच्या हीरक महोत्सव वर्षानिमित नांदेड जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांसाठी दि. ६ फेब्रूवारी रोजी विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील पन्नासहून अधिक शाळेतील बालवैज्ञानिक आणि मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या प्रकल्पाची मांडणी केली. प्राथमिक गटातून 'इकोफ्रेंडली मल्टीयुजेबल अॅग्रिकल्चरल मशीन’ 'पावसाच्या पाण्याचे जल���िंचन' 'पाण्याची आद्रर्ता ओळखणे' माध्यमिक गटातून 'स्मार्ट होम प्रकल्प' 'स्मार्ट ब्लाईंड स्टीक प्रकल्प' 'आयुर्वेदिक बाम' या प्रकल्पाची निवड झाली. या विज्ञान जत्रेत संस्थेच्या प्राथमिक, शिवाजी हायस्कूल, सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्ह बेस्ड टिचिंग अँड लर्निंग या ABTL. अंतर्गत विविध शैक्षणिक साहित्य निर्मितीची मांडणी या विज्ञान प्रदर्शनात केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालविज्ञान जत्रेतील विजेत्या बालवैज्ञानिकांचे बक्षीस वितरण करण्यात आले. क्षेत्रिय बालविज्ञान जत्रेचे उद्घाटन हैदराबादच्या कार्टेल इंजिनियर प्रा.लि.चे संचालक सुरेश पटवर्धन व हयुव्हेल लाईफ सायन्सेस प्रा.लि.चे संचालक डॉ.शिशीर कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे सदस्य डॉ.शंभुनाथ कहाळेकर, डॉ.योगेश जोशी, चंद्र्कांत जोशी, चेअरमन प्रमोद देशमुख यांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि सहभागी बालवैज्ञानिकांची उपस्थिती होती.
माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन उत्साहात....
कुठे गळाभेट तर कुठे आनंदाश्रू... माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना केली मोकळी वाट....
अनेक वर्षानंतर मित्र व गुरुजांना भेटल्यानंतर शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पांचे नुसते कल्पनाचित्र उभे केल्यास कसे वाटेल... येथे त्याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांना घेता आला. संस्थेने हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दि.८ फेब्रुवारी रोजी माजी विद्यार्थी व कार्यकर्त्याचे भव्य स्नेहमिलन आयोजित केले होते. यावेळी अनेक वर्षानंतर प्रिय मित्र व गुरुजी भेटल्यानंतर कुठे गळाभेट तर कुठे आनंदाश्रू व गप्पांच्या मैफिलींचे दृश्य दिसत होते. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त होत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. या स्नेहमिलन कार्यक्रमात अनेक विद्यार्थी एकमेकांना शालेय जीवनानंतर प्रथमच भेटले.अध्यक्षीय समारोपात प्रशालेचे प्रथम विद्यार्थी तथा संस्थेचे माजी कार्यकर्ते दत्ताराम खिरप्पा यांनी, कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या प्रयत्न आणि परिश्रमच्या त्यागातू���च ही संस्था लौकिकास आली. सगरोळी व पंचक्रोशीतील मुलांना संजीवनी देणारी ही संस्था आज खूप मोठे कार्य करीत असल्याने अभिमान वाटतो असे गौरोद्गर काढले. या स्नेह मेळाव्यास मागील ६० वर्षातील हजारो माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
हीरक महोत्सव सांगता समारोह
संस्थेस साठ वर्ष पूर्ण झाल्याने गतवर्ष विविध उपक्रमांनी साजरे झाले. दि.८ फेब्रुवारी रोजी हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष प. पू. श्रद्धेय डॉ. ज्ञानराज माणिकप्रभु महाराज होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.अशोक चव्हाण व खासदार विनय सहस्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार सुभाष साबणे, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, सरपंच सौ. सुजाता सिदनोड, संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, हीरक महोत्सव समितीची अध्यक्ष अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होती.
कुठलीही दळनवळणाची साधने नसताना सगरोळीसारख्या ग्रामीण भागात ६० वर्षापूर्वी शैक्षणिक संस्था स्थापन करणे याचा विचार करणेही कठीण होते. परंतु कर्मयोगी बाबासाहेबांनी १९५९ साली संस्कृति संवर्धन मंडळाची स्थापना करून छोट्याश्या झोपडीत शाळा सुरु केली हे त्यांचे मोठे धाडसाचे काम होते. शिक्षणाचा व्यवसाय न बनवता समाजाच्या उन्नतीसाठी हे शिक्षणाचे पवित्र कार्य निरंतरपणे चालू आहे याचा अभिमान वाटतो. संस्थेचे कार्य आदर्शवत असून समाजाला दिशा देण्याच कार्य करीत आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून नेहमी संस्थेच्या पाठीशी राहील अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.
खूप दिवसांपासून सगरोळीच्या संस्थेची भेट घेण्याची इच्छा होती. हीरक महोत्सवी सांगता समारोह कार्यक्रमामुळे योग जुळून आला. ग्रामीण विकासात महिलांची मोलाची भूमिका आहे. हि संस्था शिक्षणासह महिला सक्षमीकरनाचे कार्य करीत आहेच. यापुढे अधिकाधिक ग्रामीण महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. तरुणांना व्यावसायिक शिक्षणातून रोजगार मिळवून देण्यासाठी येथे सुरु असलेले उपक्रम स्तुत्य आहेत असे गोरोद्गार खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी काढले.
कर्मयोगी बाबासाहेबांनी सर्वसामान्यांना आधार देण्याचे महान कार्य केले आहे. समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो. जे समाजाचे आहे ते समाजासाठी आनंदाने व प्रामाणिकपणे देण्याचे कार्य मागील ६० वर्षापासून संस्था अखंडपणे करीत आहे. डॉ. ज्ञानराज माणिकप्रभू महाराज आपल्या अध्यक्षीय आशीर्वादपर भाषणात म्हणाले.
प्रास्ताविकेत संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी, पैशांचा संचय न करता सद्गुणी व प्रामाणिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संचय करावा असे नेहमी बाबासाहेब म्हणत. त्यांच्या या विचारांनीच आज अनेक संस्था कायकर्ते, पंचक्रोशीतील माणसे जोडली गेली आहेत. त्यांच्या विश्वासावरच संस्था यशस्वी वाटचाल करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुकुंद महाराज तर आभार गंगाधर जाधव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे माजी विद्यार्थी ग्रामस्थ, पालक, हितचिंतक मोठ्या संखेने उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सव....
दररोज हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती... कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते उदघाटन
दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे दि. ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवन यांच्या हस्ते झाले. यादरम्यान अनेक कृषी क्षेत्रातील तज्ञ व यशस्वी शेतकऱ्यांनी फायदेशीर शेतीचा कानमंत्र दिला. तर कृषी विज्ञान केंद्राने प्रक्षेत्रावर मांडणी केलेल्या प्रयोगाची शिदोरी शेतकरी घेऊन गेले. उद्घाटन प्रसंगी कुलगुरू यांनी, पारंपरिक शेतीत बदल करुन भाजीपाला, फळबागा या मिश्र पिकांसह शेळीपालन,मत्स्यपालन, कुक्कुटपालन, रेशीमशेती, मधुमक्षिका पालन, दुग्धव्यवसाय, अशा कृषिपुरक व्यवसायासह एकात्मिक शेती करावी असे प्रतिपादन केले. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनि पोषक परसबागेची निर्मिती करावी. आर्थिक प्राप्तीसह आरोग्यसंवर्धक होईल. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान निवडीचे पर्याय उपलब्ध होत आहेत असे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ATARI)चे संचालक डॉ. लखनसिंग म्हणाले. येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सव शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी असल्याचे जिल्हा कृषि अधीक्षक रविशंकर चलवदे म्हणाले. डॉ. धनंजय परकाळे यांनी पशुसंवर्धनासाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसाय करावा असे आवाहन केले.
कृषी तंत्रज्ञान महोत्सवातील लक्षवेधी कार्यक्रम... यशस्वी उद्योजीका सावित्रींच्या लेकीचा सन्मान...
दि. १० रोजी सावित्रींच्या लेकींनी बचत गटांच्या माध्यमातून उभारलेल्या व्यवसायाची यशोगाथा महिला मेळाव्यात उपस्थित महिलांसमोर मांडण्यात आली.
कामगार ते यशस्वी उद्योजिका हा प्रवास करणाऱ्या कमलाताई परदेशी यांनी, कोणतेही काम हलके नसते, एकजुटीने कार्य केल्यास यश नक्कीच मिळते. व्यावसायिकतेला एकतेची जोड देऊन ते अधिक गतिमान करता येऊ शकते हा स्वतःचा अनुभव विषद केला. अंबिका मासालेच्या माध्यमातून विविध प्रकारची मसाले देश विदेशात विक्री केली जातात. दहा महिलांपासून सुरु झालेला या व्यवसात दोनशे महिला कार्यरत असून आज वर्षाकाठी सहा कोटीची उलाढाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्री मेघनाताई झुझाम यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून सावित्रीबाई फुलेंचा जीवनप्रवास उलगडत प्रबोधनातून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी राजेश धुर्वे यांनी, महिला स्वयं सहाय्यता गटांसाठी नाबार्डच्या विविध योजनेची माहिती दिली. यावेळी महिला बचत गट व यशस्वी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुणे येथील धन्वंतरी प्रतिष्ठानच्या श्रीमती प्रेरणा देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व नांदेड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते यशस्वी महिला उद्योजिकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महोत्सवात बहरली खाऊ गल्ली... बचतगटांना मिळाले व्यासपीठ
भेळ, पाणीपुरी, ब्रेड पकोडा, वडापाव, पावभाजी. गुलाब व आवळा शरबत, दही धपाटा, मशरूम पकोडे, पापड, लोणचे, विविध प्रकारचे मसाले, अगरबत्ती यासह घोंगडे, गोदड्या व गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर महिला व बच्चे कंपनींनी मोठी गर्दी केल्याने महोत्सवात खाद्य संस्कृति बहरली होती.
जिल्ह्यातील महिला बचत गटांना व्यासपीठ, त्यांच्या उत्पादनांची विक्री व प्रचार प्रसार व्हावा, बचत गटांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी खाद्य संस्कृतीचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील पन्नासहून अधिक बचत गट यासह अनेक महिलांनी आपापली उत्पादने या खाद्य संस्कृतीत मांडली होती. या महोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने उद्योजक महिलांनी समाधान व्यक्त केले. महिला आर्थिक विकास महा��ंडळ, उमेद, डीआरडी, धान फाउंडेशन, महिला व बालकल्याण विभाग, आत्मा व शिक्षण मंडळ यांच्या अंतर्गत असलेल्या अनेक बचत गटांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला होता.
ग्रामीण कुटुंबाच्या निरामय जीवनासाठी गंगम्मा मंडल पोषणबाग... (न्यूट्रीशियन गार्डन) शेतकऱ्यांची पसंती...
निरामय जीवनासाठी विषमुक्त अन्न सेवन हा एकमेव पर्याय असून नैसर्गिक तथा सेंद्रिय पद्धतीने कुटुंबापुरते शेतात किंवा घराशेजारी मोकळ्या जागेत 'गंगम्मा पोषणबाग' विकसित करून ताजा व सकस भाजीपाला सेवन केल्यास आर्थिक बचत होऊन निरोगी जीवन जगता येऊ शकते. याकरिता ३० फुट गोलाकार जागेवर गंगम्मा पोषणबागेचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते. कृषी तंत्रज्ञान महोत्सवात हे मॉडेल शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले. ह्या पोषण बागेत मेथी, पालक, गाजर, टोमॅटो, मोहरी, वांगे, भगर, मिरची, मुळा, बीट, पानकोबी, राजगीरा, कांदा, फुलकोबी, मका, शेपू, भेंडी, कोथिंबीर, गवार, काकडी, हळद, दोडका, औरा, कारला अशा ऐकून २२ प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, वेलवर्गीय व कंदमूळवर्गीय भाजीपाला घेण्यात आला. या प्रकारच्या भाजीपाला घरच्या घरी सांडपाणी, टाकाऊ अन्न व ओला कचरा, शेणखत याचा उपयोग करून पिकवावा. या भाजीपाला सेवनातून रक्तशय कमी करण्यासाठी लागणाऱ्या लोह आणि फोलिक असिडयुक्त भाजीपाला दररोज मिळतो. शरीराला लागणाऱ्या कॅल्शीयम व इतर खनिज, जीवनसत्वे यांची गरज पूर्ण होते. महिलांमध्ये रक्तातील तांबड्या पेशी म्हणजे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते तर हाडांचा ठीसुळपणा आढळून येतो. ह्या पोषणबागेतील ह्या भाजीपाला सेवन केल्यास शरीरास लागणाऱ्या सर्व प्रकारच्या जीवनसत्वांची गरज पूर्ण होते. ह्या पोषणबागेतून कुटुंबाला पुरेसा भाजीपाला प्राप्त होऊन अधिकचा भाजीपाला विक्रीही करता येऊ शकतो त्यामुळे दवाखान्याला लागणारा खर्च व भाजीपाल्यातून मिळणारे उत्पन्न पाहता कुटुंबाचे आर्थिक स्त्रोतहि हि पोषणबाग बनू शकते, फक्त गरज आहे ती शेतकऱ्यांनी अवलंब करण्याची. निरोगी ग्रामीण जीवन यासाठीच महोत्सवात ह्या गंगम्मा मंडल पोषणबागेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर ठेवले होते. तेलंगणातील गंगम्मा नावाच्या महिलेने आपल्या घराच्या अंगणात अशी बाग विकसित केली म्हणून त्यास गंगम्मा तर गोलाकार असल्याने मंडल असे संबोधले गेल्याने त्यास 'गंगम्मा मंडल' पोषणबाग असे नाव पडले.
तंत्रज्ञान महोत्सवात शेतकऱ्यांना रायपूरच्या एक किलो पेरुची ओळख.
रायपुर येथील व्ही.एन.आर. नर्सरीने विकसित केलेले बीटी पेरूचे वाण महोत्सवात शेतकऱ्यांना अवलोकनार्थ उपलब्ध केले होते. एक किलोचे हे पेरू पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. शेतकऱ्यांनी पारंपारिक पिक पद्धतीसोबतच फळबाग लागवड करावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून महोत्सवात अशा विविध नवीन वाणाची ओळख करून दिली जाते.
बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्याक्षिके....
पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूवर आधारित शेतीपद्धती अवलंबून आहे. परंतु हवामानाच्या अनिश्चीतीतेमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. ह्यावर उपाययोजना म्हणून हवामानास अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित पीक पद्धतीसाठी या महोत्सवात प्रात्याक्षिके सादर केली होती.
एक एकर प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अनिश्चित पाउस मानासाठी पर्यायी आपत्कालीन पिक योजना, त्यामध्ये हवामान अनुकूल वाणाचा वापर व कमी कालावधी, कीड व रोग प्रतिकारक, पाण्याचा ताण सहन करणारे वाण, उतारला आडवी मशागत व पेरणी, रुंद वरंबा सरी यंत्राने (बी.बी.एफ.) पेरणी, आंतरपीक पद्धती, शून्य मशागत लागवड, प्लास्टिक व शेतातील टाकाऊ काडी कचऱ्यापासून मलचिंग तंत्रज्ञानाचा वापर हिरवळीच्या खतांचा वापर, भूसुधारकाचा वापर, कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन, माती परीक्षणावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, तुषार व ठिबक अशा सूक्ष्म सिंचनाचा वापर, रोग व किडींच्या संरक्षणापासून बीज प्रक्रिया, जल व मृद संधारनासाठी पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे, संरक्षित सिंचनासाठी शेत तळ्याचा वापर, एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब म्हणजे कृषी पूरक उद्योग असे ऐकून १६ तंत्रज्ञानावर आधारित प्रात्याक्षिके प्रत्यक्ष शेतावर केली होती.
महोत्सावाचा समारोप
महाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी, निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणत्याही प्रकारच्या पिकांचे खात्रीलायक उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. शेतीमालास हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगेल असे प्रखरपणे आपली भावना व्यक्त केली. संस्थेच्या कृषि विज्ञान केंद्राचे कार्य हे शेतकऱ्यांना आधार देणारे असून कृषि तंत्रज्ञानाचा आधार घेत शेती करावी असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय बांबू अभियान मराठवाडा विभागाचे समन्वय श्री भालेकर यांनी टिशूकल्चरच्या रोपांपासून केलेली बांबूची लागवड फायदेशीर आहे. बांबू हे बहुउपयोगी वनस्पती असून त्याचा वापर मोठया प्रमाणात केला जात आहे. कमी पाण्यावर होणारी बांबूची शेती शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले. प्रगतशील शेतकरी विनोद पाटील यांनी लिंबू, सीताफळ, पेरू,फळबाग शेती करून आर्थिक प्रबळता मिळवीता येते हे प्रत्यक्ष स्वअनुभवातून आलेले अनुभव शेतकऱ्यांसोबत कथन केले. कांदा एक फायदेशीर शेती याविषयी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कांदा उत्पादक शेतकरी उद्धवराव खेडकर यांनी, कांदा हे हमखास उत्पन्न देणारे पीक असून कमी पाण्यावर, कमी उत्पादन खर्च व कमी कालावधीचे पीक असल्याने कांदा लागवडीसचे आवाहन केले.
नेदरलँडची 'एरीस' आंतरराष्ट्रीय संस्था व कृषी विज्ञान केंद्रामध्ये सामंजस्य करार...
वातावरण बदलाचा शेतीवर होत असलेला अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन कृषीपूरक उद्योगाला चालना देण्यासाठी संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे देशातील निवडक शेतकऱ्यांसाठी नेदरलँडच्या 'एरिस' या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेमार्फत ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील दि. १७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाले. यावेळी 'एरीस' व कृषी विज्ञान केंद्रामध्ये सामंजस्य करार झाला असून, संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख व नेदरलँडच्या 'एरीस' संस्थेचे प्रशिक्षक तथा प्रतिनिधी हेलमीक व्हॅन रइस यांनी करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी एरिस संस्थेच्या अॅन एस्पेल, भारतातील प्रशिक्षण प्रतिनिधी श्रीमती डॉ. तरन्नुम कादरभाई, सगरोळीच्या सरपंच सौ. सुजताताई सिद्नोड, जेष्ठ नागरिक देविदासराव देशमुख, कृषी विज्ञान केंद्रात्तील शास्त्रज्ञ व शेतकरी उपस्थित होते. यापुढे ह्या दोन संस्था एकत्रितपणे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षण तथा इतर माहिती आदानप्रदान करणार आहेत.
'एरीस' या संस्थेतर्फे शेतकऱ्यांना कुकुटपालन व्यवसायासाठी उपयुक्त असे ज्ञान दिले जाईल अशी शिक्षण, प्रशिक्षण व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. जगातील सर्वच शेतकऱ्यांना या व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी 'एरिस' संस्था सन १९७० पासून अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देते.
करारामधील वैशिष्टे
'एरीस' ट्रेनिंग सेंटरतर्फे कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना व निवडक शेतकऱ्यांना दरवर्षी नेदरलँड् येथे अद्यावत प्रशिक्षण मिळणार. प्रशिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ व शेतकरी भारतातील इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतील. कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यकर्त्यांना प्राधान्याने शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न असेल. व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल, जगातील इतर देशात असलेल्या 'एरीस' च्या संबंधित संस्थांबरोबर शिक्षण, कृषी व पशु कल्याण याविषयावर माहितीचे आदानप्रदान होईल. संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनाही संधी उपलब्ध होईल. व्यावसायिक कुकुटपालनास चालना देण्यासाठी दोन्ही संस्था विविध उपक्रम हाती घेतील. सगरोळीसारख्या भागात प्रशिक्षण देण्याची संधी आम्हाला कृषी विज्ञान केंद्रामुळे प्राप्त झाली. 'एरीस' प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देणारी संस्था आहे. प्रशिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांनी घेतल्यास अधिक आनंद होतो. हा झालेला करार आमच्यासाठी समाधानकारक असून, येथे प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या अनुभावरून ह्या दोन संस्थेत शेतकऱ्यांसाठी काम करण्याकरिता मोठा वाव असल्याचे हेलमिक म्हणाले. हा करारनामा नसून सहनामा आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी कार्य करणार आहोत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होणार आहे. कुकुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी आता नेदरलँड येथे पाठवता येईल. असे संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी सांगितले.
बालकांचे हक्क याविषयी तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न
UNRCR सेंट्रल फॉर सोशल एकॅशन मुंबई येथील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील शिक्षक, गृहपाल, पर्यवेक्षक, यांच्यासाठी दि.२७ ते २९ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेतून मुलांना स्वहक्काची जाणीव करून देणे, मुलांच्या जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव, मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न, शासकीय स्तरावरील उपक्रमात नेतृत्व विकासाची संधी मिळवून देणे, एकजूट होऊन शासकीय यंत्रणेत सहभाग घेणे, यासोबतच मुलांशी संवाद, त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या व प्रश्न शासन स्तरावर सोडविणे. बालसंसद ही पूर्णतः मुलांच्या सहभागावर आधारित असून यामध्ये ०६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा प्रामुख्याने सहभाग असून बालसभेच्या माध्यमातून कौशल्य विकास, गट संघटन, भविष्यातील समाजाचे जबाबदार नागरिक घडविण्यासाठी बालसंसद कार्य करत आहे.
वरोरा येथील जोडो-भारत राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंचे यश..
दि.९ फेब्रुवारी रोजी आनंदवन-वरोरा (जि.चंद्रपूर) येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत संस्थेतील खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. महाराष्ट्र अॅथलेटीक्स संघटना व चंद्रपूर जिल्हा अॅथलेटीक्स संघटना संलग्नित श्रद्धेय बाबा आमटे स्मृती निमित्त महारोगी सेवा समिती, वरोरा आनंदवन द्वारा भव्य राज्यस्तरीय जोडो भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ५ किमी, १० किमी व २१ किमी या विविध प्रकारात सगरोळीच्या ऐकून ७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पाच किमी धावणे स्पर्धेत सचिन पवार याने १५ मिनिट १७ सेकंदात स्पर्धा पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला तर विष्णू लव्हाळे याने १० किमीची स्पर्धा ३३ मिनिट १३ सेकंदात पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला इतर कृष्णा भालेवर ५ किमी, साईनाथ उस्केलवार ५ किमी, अनिल तर्फेवार २१ किमी, राजुरे इरवंत २१ किमी, व मारोती वडजे १० किमी. या खेळाडूंनीहि समाधानकारक यश मिळविले. पूज्य बाबा आमटे यांच्या कुटुंबीयांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव, क्रीडाप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
नेदरलॅंडमधील शिक्षक जोहान्स व अॅन रमले शाळेत....
विद्यार्थ्यांशी साधला संवाद व कृतियुक्त शिक्षण पद्धतीचे केले कौतुक.
नेदरलॅंडच्या जोहान्स इनटी हॉल व अॅन वांडर्स या शिक्षकांनी संस्थेच्या शाळेला भेट दिली. एक दोन नव्हे तर तब्बल दहा दिवस ते विद्यार्थ्यांसोबत रमले. यादरम्यान त्यांनी वर्ग भेटी, विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधून येथे चालू असलेल्या (ए.बी.टी.एल) अॅक्टीव्हिटी बेसड् टीचिंग लर्निंग म्हणजे कृतियुक्त शिक्षण पद्धतीचे कौतुक केले तर विद्यार्थ्यांचा वर्गहि घेतला.
जोहान्स इनटी हॉल हे नेदरलॅंडच्या अॅन्हेम या शहरातील अॅनेंथीन कॉलेजमध्ये गणित विषयाचे शिक्षक आहेत. तर अॅना वांडर्स या महिला शिक्षीका केस्टर्न शहरातील हेलीकॉन ऑप्लीडींजर ह्या शाळेत कृषी व्यवसाय हा विषय शिकवितात. या दोघांनीही शिवाजी हायस्कूल, शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल, सैनिकी विद्यालय व मिलेनिअम इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत संस्थेतील सायन्स पार्क, अटल टिंकरिंग लॅब, झेस्ट, स्पीकवेल, मेवा, इक्विप, सील या शैक्षणिक उपक्रमांची तर सगरोळी सनराइज क्रीडा प्रकल्पाची माहिती घेतली. यादरम्यान त्यांनी दोन्ही देशातील शिक्षण पद्धतीची देवान घेवाण केली.
सगरोळीच्या शाळेतील शिक्षण पद्धतीत केले जाणारे विविध प्रयोग अद्यावत असून आधुनिक जगाचे आव्हाने पेलणारे आहेत असे मनोगत ह्या शिक्षकांनी व्यक्त केले. शाळेच्या वेळानंतर ह्या परदेशी पाहुण्यांनी येथील शेती, बाजारपेठ, गावातील नागरिकांच्या भेटी व शेतकरी, व्यापाऱ्यांशी संवाद साधून येथील समाज जीवनाविषयी माहिती घेतली. येथील शाकाहारी पदार्थ खूप छान असून सोबत घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. आम्हांला पुन्हा संधी मिळाली तर आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा येऊ म्हणत येथील विद्यार्थी आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
राज्यस्तरीय वॉटर आलिम्पियड स्पर्धेत सुयश .....
रोटरी वॉटर ऑलिम्पियाड२०२० ही राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा पुणे विद्यापीठाच्या वतीने दि.२३ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. राज्यभरातून ५००० मुलांनी ही परीक्षा दिली. यामधून प्राथमिक गटातून १०, माध्यमिक गटातून १० मुलांनी यश संपादन करून प्रश्नमंजुषा मध्ये सहभागी झाले. यात प्राथमिक मधून कु. धनश्री राऊलवार तृतीय तर माध्यमिक गटातून वेदांत गिरगावकर चौथा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. संस्था आणि प्रशालेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
प्रशालेतील मुलींना सायकलचे वाटप.....
शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत संस्थेच्या शिवाजी हायस्कूल मधील बाहेर गावाहून ये-जा करणाऱ्या ९ मुलींना सगरोळीच्या सरपंच सुजाताताई सिदनोड, संस्थेचे सचिव डॉ. जयंत जकाते यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक, पालक यांची उपस्थिती होती.
संस्कार भारतीतर्फे रांगोळी आणि नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
संस्थेच्या सैनिकी विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी दि. ४ मार्च रोजी रांगोळी व नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. महिला हक्क आणि संस्कार हि काळाची गरज असल्याने या विषयी प्रमुख मर्गदर्शक सौ. स्नेहलताई पाठक य��ंनी माहिती दिली. गीताताई रावतोळे यांनी भू अलंकरण रांगोळी तर सुनीताताई घाटे यांनी नाट्य अभिनयाचे मार्गदर्शन केले.
व्यवसाय अभ्यासक्रमातील ४४ विद्यार्थ्यांची निवड
श्री छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरिता विविध औद्योगिक कंपनीत नौकरीची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने दि.११ फेब्रुवारी रोजी भरती मेळावा आयोजित करण्यात आला. सगरोळी, नायगाव, देगलूर, भोकर परिसरातून ११६ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील ४४ मुलांना नौकरीची संधी उपलब्ध झाली. मेटलमॅन ऑटो प्रा. ली., इंडोरन्स इंजिअरिंग, बिजी लिड्रं, औरंगाबाद इलेक्ट्ररीकल्स, धूत ट्रान्समिशन, वर्ल्ड वाईड पुणे, ऑईल फिल्ड मशिन प्रा. ली. या उद्योग समूहाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली.
सूर्यनमस्कार व समूहगायन स्पर्धेत प्रशालेचे यश
मातृमंदिर विश्वस्त संस्थ निगडी, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार, विद्यार्थी समूहगायन, अध्यापक समूहगायन स्पर्धेत संस्थेच्या प्राथमिक, शिवाजी हायस्कूल आणि सैनिकी विद्यालयाने सहभाग घेतला. मराठवाडा स्तरावरील सूर्यनमस्कार स्पर्धेत सैनिकी विद्यालय प्रथम, शिवाजी हायस्कूलने तिसरा क्रमांक मिळविला. विद्यार्थी समूहगायन स्पर्धेत शिवाजी हायस्कूल व्दितीय तर सैनिकी विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूलला उतेजनार्थ गौरविण्यात आले. दि.९ फेब्रुवारी रोजी झालेल्या मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी यांच्यावतीने आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात संस्थेचे प्रतिनिधी मल्लखांब व सूर्यनमस्कार प्रशिक्षक विनोद वाघमारे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती शिवजन्मोत्सव हर्षोल्हासात साजरा
छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाच्या वतीने शिवजन्मोत्सवा चा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी मिलेनियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा तर प्राथमिक शाळेच्या मुलांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र आधारित विविध प्रसंगातून सादरीकरण केले. शिवाजी हायस्कूलच्या कु. श्वेता तुकडे हिने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती आपल्या प्रभावी वक्तृत्वातून कथन केले. सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याचे गुणगान पोवाड्यातून सादर केले. प्रमुख वक्ते यांनी 'शिवरायांशी का आठवावे' या विषयी बोलतांना आपण आपली निष्ठा आणि नैतिकता जपून ती देशकार्यासाठी वर्तनातून आदर्श दाखवून देण्यासाठी दक्ष राहण्यास सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील देशमुख होते. यावेळीं विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
संकल्प दिन उत्साहात... 'क्षात्रतेज' वार्षिक अंकाचे विमोचन
संस्कृति संवर्धन मंडळ संस्थेचे संस्थापक पू. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांचा जन्मदिन दरवर्षी 'संकल्प दिन' म्हणून साजरा केला जातो. दि. १५ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेचे संचालक श्री गिरीष बापट, आणि विवेकानंद रुग्णालयाचे प्रमुख पदमभूषण डॉ.अशोकजी कुकडे उपस्थित होते. यावेळी सैनिकी विद्यालयाच्या 'क्षात्रतेज' वार्षीकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात झाले.
कर्मयोगी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संकल्प ठरविला जातो व तो पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते कटिबद्ध असतात. यावर्षी 'कार्याकार्त्यामधील व्यावसायिकता' हा संकल्प निश्चित केला असून ह्या विषयी गिरीष बापट यांनी, वेळेचे व्यवस्थापन, अचूक मोजमाप व कामाचे नियोजन करावे, ध्येय निश्चित ठेऊन उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयोगशीलता अंगीकारल्यास कार्यकर्त्यामध्ये व्यावसायीकता दृढ होण्यास मदत होईल. कर्मचारी आणि कार्यकर्ता यातील फरक सांगून जो निष्ठेने आणि एकाग्रतेने काम करतो तो कार्यकर्ता. अशा कार्यकर्त्याकडून असे संकल्प पूर्ण होणे हे समाज आणि राष्ट्र हिताचे असते म्हणून व्यावसायिकता जोपासण्यासाठी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यानी वेळ, पैसा आणि मेहनत आदींचे नियोजन करावे म्हणजे यश मिळण्यास फार वेळ लागणार नाही. चांगले ते घ्यावे व वाईट सोडावे, जे हवय त्याची निर्मिती केली पाहिजे त्यातून आनंद मिळतो. कमीत कमी पैशात व कष्टात उद्दिष्टांनुसार कार्याची पूर्तता केल्यास ती व्यावसायिक कृती ठरते. नवीन संकल्पना सुचाव्यात त्या अनुषंगाने विचार करावा. या माध्यमातूनच व्यावसायिक वृत्ती निर्माण होईल असे सांगितले. व्यसनाधीनता व त्याचे मानवी जीवनावर होत असलेले दुष्परिणाम या विषयी सांगताना डॉ. अशोक कुकडे यांनी मानवी शरीर हे सर्वात मौलिक संपत्ती असून सूर्यनमस्कार, योगा याद्वारे आपण आरोग्यमय जीवन व्यतीत करावा असा संदेश दिला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी श्री देशमुख यांनी आपण केलेला संकल्प हा कार्यामधून व कृतीतून दाखवून देत त्यासाठी सातत्याने अधिक प्रयत्नशील राहुन कार्य करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला. यावेळी विविध पुरस्कार प्राप्त झालेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते झाला.
श्रध्दा देशमुख महिला भूषण पुरस्काराने सन्मानित ...
सामाजिक क्षेत्रात विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन दरवर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दै. समीक्षा, पत्रप्रेस परिषद, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप व ह्युमन राईट्स फाउंडेशनतर्फे गेल्या दहा वर्षापासून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा जागतिक महिला दिनी दि.८ मार्च रोजी विशेष सन्मान केला जातो. संस्थेच्या उत्कर्ष अॅग्रो इंडिस्ट्रीजच्या संचालिका श्रद्धा देशमुख यांचा माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कुसुमताई महिला भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. श्रद्धा देशमुख या उत्कर्ष अॅग्रो इंडिस्ट्रीद्वारे अन्न प्रक्रिया उद्योग व प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. सोया दूध, पनीर, सीताफळ, आवळा, करवंद, कोरफड या पासून विविध उत्पादने व लोणचे, स्क्वॅश आदी पदार्थाची निर्मिती व महिलांना प्रशिक्षण देत आहेत. गृहउद्योग, मिरची पावडर, शेवगा पावडर, मसाले, डाळ निर्मिती, ब्युटीपार्लर, पाक कला, महिलांच्या आरोग्य विषयी शिबिरांचे आयोजन करून सक्षमीकरणासाठी मोलाची भूमिका पार पाडत आहेत.
काटकळंबा ता कंधार येथे क्षमता बांधणी टप्यास सुरुवात...
नाबार्ड व ॲटलास काॕपको चॕरिटेबल संस्था पुणे यांनी काटकळंबा ता.कंधार पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर एप्रिल 2019 पासून मृद व जलसंधारणाचे विविध काम संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातुन हाती घेतले आहेत.यावर्षी नाबार्डने क्षमता बांधणी टप्यास मंजूरी दिली असून यात एकूण 100 हेक्टर क्षेत्रावर मृदसंधारणाची कामे प्रस्तावित आहेत यात सलग समतल चर ,खोल सलग समतल चर,गली प्लग बांधबंदिस्ती ,सांडवे तसेच वृक्षारोपण आदी कामांचा समावेश आहे.दि.24 एप्रिल 2020 रोजी प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे याप्रसंगी पाणालोट समितीचे अध्यक्ष श्री बाबुराव बस्वदे,बालाजी प��नपट्टे,मोहन पवार उपसरपंच गोविंदराव वाकोरे,सरपंच प्रतिनिधी राष्ट्रपाल चावरे साईनाथ कोळगिरे,सुभाष मोरे,सदाशिव हाम्पले ,रामदास बस्वदे व तसेच पाणलोट समितीचे पदाधिकारी आणि संस्था प्रतिनिधी गंगाधर कानगुलवार ,व्यंकटी ढाले आदी उपस्थित होते.सध्या गट क्रमांक 167 व 166 या क्षेत्रावर सलग समतल चर,खोल सलग समतल चर आदी कामे मजूरांमार्फत प्रगतीपथावर आहेत.कोरोना महामारी लक्षात घेता मजूरांना कामे देतांना आवश्यक ती काळजी व खबरदारी घेतली जात आहे.लाॕकडाऊन कालावधीत गावातील स्थानिक मजूरांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाल्याने गावक-यांनी सामाधान व्यक्त केले आहे.क्षमता बांधणी टप्पा यशस्वीपणे पुर्ण झाल्यानंतर नाबार्ड मुख्य टप्यास मान्यता देणार आहे.सदरील प्रकल्प हा नाबार्डचा महत्वाकांक्षी प्रकल्प हवामानावर आधारित पाणलोट प्रकल्प असून बदलत्या हवामानाचा अभ्यास करुन शेतक-यांना पिक रचनेत पध्दतीत बदल करता येणार आहे.
विद्यार्थ्यांकडून ग्रंथदान....
संस्थेच्या सैनिकी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा सोहळा संपन्न झाला. यावेळी विदार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी प्रशालेतील आपल्या लहान बांधवांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी दहा हजार रुपये किमतीचे स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास संदर्भीय व विविध ग्रंथ वसतिगृहास भेट देऊन वसतिगृहात ग्रंथालय सुरू करून नवा आदर्श निर्माण केला. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
भावपूर्ण श्रद्धांजली
दीपक कानेगावकर
सगरोळी सनराईज क्रीडा प्रकल्पाचे मार्गदर्शक तथा मुंबई येथील उद्योजक दीपक कानेगावकर यांचे दि. २१ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे निधन झाले. सन २००३ साली कानेगावकर यांच्या मार्गदर्शनाने निवडक खेळाडूंसह सगरोळी सनराईज या क्रीडा प्रकल्पाची सुरुवात झाली. अठरा वर्षानंतरही हा प्रकल्प कानेगांवकर यांनी ठरवलेल्या उद्देशानुसार वाटचाल करीत आहे. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय तथा अंतराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे येथील संस्थेत वर्गातील शिक्षणाएवढेच मैदानातील खेळांनाही महत्व प्राप्त झाले आहे. दर्जेदार प्रशिक्षण, योग्य आहार, प्रशिक्षांसाठी लागणारे साहित्य आदींची पूर्तता कानेगांवकर यांनी केली. त्यांच्या सोबत अनेक क्रीडाप्रेमी संस्थेशी जोडल्या गेले व आज दीपक कानेगांवकर यांच्यामुळेच संस्थेत ��्वतंत्रपणे क्रीडा धोरण अंमलात आले आहे.
माधवराव गटणे
श्री. माधवराव गटणे यांचे पुणे येथे दि.२३ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. संस्थेच्या बालकमंदिर वसतिगृहात ३२ वर्षे गृहपाल पदी कार्यरत होते. अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने त्यांनी विद्यार्थ्यांची सेवा केली. हजारो निराधार व गरजू मुलांचा पित्याप्रमाणे त्यांनी सांभाळ केला. संस्थेने एक पितृतुल्य व्यक्तिमत्व गमावले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
नारायण आणेराव
राष्ट्रीय खेळाडू व स्थलसेनेत २५ वर्षे देशसेवा केल्यानंतर नारायण आणेराव यांनी संस्थेत 'सगरोळी सनराईज या क्रीडा प्रकल्पाच्या मुख्य प्रशिक्षकाची धुरा सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाने खेळाडूंनी अनेक स्पर्धा गाजवल्या. यामध्ये आणेराव यांची भूमिका महत्वाची होती. नारायण आणेराव यांचे दि. २५ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. संस्था परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली...
0 notes
How to join NDA (National Defence Academy)? 🇮🇳 🇮🇳
तयारी एन.डी.ए ची…!!!
महाराष्ट्रातील अधिकाधिक तरूणांना लष्कर अधिकारी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध.
महाराष्ट्राने नव्हे संपूर्ण देशाने अनुभवलेले महापूर असो किंवा ढासळलेला कायदा व सुरक्षा स्थिती असो देशासाठी काहीही करण्यासाठी लष्कर तयार असतात.
अनिस अकॅडमी विश्रांतवाडी,पुणे 411015
या संस्थेची स्थापना सन 1988 साली झालेली असून विश्रांतवाडी पुणे येथे प्रशिक्षण केंद्र आहे.येथे विद्यार्थ्यांना इ.8वी ते इ.12वी पर्यंत शिक्षण देण्यात येते.
येथे शालेय अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. मध्ये प्रवेश व मुलाखतीची तयारी करून घेतली जाते.
आजपर्यंत या संस्थेचे 550 पेक्षा अधिक सैन्य अधिकारी आर्मी, एअरफोर्स मध्ये कार्यरत आहेत.
एप्रिल 2019 मध्ये झालेल्या परिक्षेत अनिस अॅकॅडमी मधून आठ मुलांची आॅफिसरसाठी निवड झालेली आहे. संपूर्ण देशभरातून साधारणपणे 400 मुलांची निवड केली जाते.त्यातून अनिस अॅकॅडमीतून या 22 मुलांची मुलाखतीसाठी निवड झाली आहे.
1)रोशन चव्हाण - पुणे
2)स्वप्नजीत पवार-तासगाव,सांगली
3) सतीश कुमारा - आंध्र प्रदेश
4) अथर्व बनसोडे- नांदेड
5) अभिषेक खुशवा- अहमदनगर
6)राहुल पिसे - लोनार बुलढाणा
7) अनुराग जाधव - वापी, गुजरात
8)पियुष थोरवे- नाशिक
9)भैरव चौटमल- सांगणे, पुणे
10)सौम्या पाटील-पुणे
11)प्रज्वल मायावंशी - अहमदाबाद, गुजरात
12)आदर्श वीर -पुणे
13)दीपक म्हस्के -लोणी,अहमदनगर
14)आदित्य कदम - लातूर
15)मनन टॅक- औरंगाबाद
16) सिद्धांत गायकवाड- पुणे
17)प्रथमेश हासे- अहमदनगर
18)यश येवला- नाशिक
19)अभिषेक गायकवाड-मिरज
20)समर्थ कुलकर्णी - अहमदनगर
21) शुभम कड-सिलोड, औरंगाबाद
22) जयंत जाधव- कोल्हापूर
आमच्या संस्थेमध्ये शिक्षणाबरोबरच राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
सध्या संस्थेमध्ये 70 पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत.
पुण्यातील तसेच संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
लवकरच आमची संस्था स्व:ताची शाळा सुरु करणार आहे ज्यात सैनिकी शिक्षण व स्पर्धा परीक्षेवर अधिक भर राहणार आहे.
लष्कर अधिकारी तयार करणारी नामवंत संस्था गेली 31वर्ष दिवसरात्र कार्यरत आहे.
ही माहिती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल.
देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग द���शाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.
भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच "National Defence Academy (NDA) / एन.डी.ए." च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए., खडकवासला, पूणे येथे करवून घेतली जाते.
पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
एन.डी.ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे.
वयोमर्यादा:
एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय - साडे सोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया:
एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.
प्रवेश परीक्षा:
एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते.
सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:
भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते.
पहिला टप्पा:
या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात.
दुसरा टप्पा:
या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group Tasks) व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चर्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test (PABT) ही आणखी एक चाचणी होते.
मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो.
एन.डी.ए. मधील प्रशिक्षण:
एन.डी.ए. मधील प्रशिक्षण कालावधी हा बी. एस. सी. तीन तर बी. ई. चार वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए. मधील बी. एस. सी. चा तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो तर बी. ई. 8 टर्म मध्ये.
येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी अधिकार्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.ए. चे तीन / चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.ए. च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.ए. च्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए. हा सर्वोत्तम पर्याय आहे.
सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:
एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते.
सातव्या वे���न आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी. कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या मैनेजमेंट कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते.
अर्ज कधी करावे:
जून मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए. प्रवेशासाठी परीक्षा दि. सप्टेंबर मध्ये घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची अंतिम तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.ए. च्या तयारीसाठी करावा.
शालेय विद्यार्थ्यांसाठी:
सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए. मध्ये दाखल होऊ शकतात.
एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे.
या काही दर्जेदार शिक्षण देणार्या सर्वोत्तम संस्थापैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती: 🇮🇳
१. सैनिक स्कूल, सातारा: ५वी व ८वी च्या विद्यार्थांसाठी:
येथे विद्यार्थ्यांना इ. ६वी व ९वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी इ. ५वी व ८वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती www.sainiksatara.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
RMS केंद्र, 1, बेंगळुरू,2 बेळगाव, 3 अजमेर, 4 धोलपूर, 5 चाईल,
संरक्षण सैन्याच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय सैन्य शाळा पूर्व जॉर्ज जॉर्जच्या रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल म्हणून स्थापित केल्या गेल्या. १ 195 .२ मध्ये, शाळा सार्वजनिक शाळेच्या धर्तीवर पुनर्रचना करण्यात आल्या आणि संरक्षण सेवा अधिकारी आणि नागरिक यांच्या मुलासाठी प्रवेश खुले करण्यात आले. १ 195 .4 मध्ये ही शाळा भारतीय पब्लिक स्कूल कॉन्फरन्स (आयपीएससी) ची सदस्य बनली आणि आजपर्यंत ती एक सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहे. १ 66 in66 मध्ये या शाळांचे नाव मिलिटरी स्कूल असे ठेवण्यात आले आणि त्याचे जुने ब्रीदवाक्य, 'प्ले द गेम' बदलून 'शीलेम परम भूषणम' ठेवले गेले, ज्याचा अर्थ म्हणजे चरित्र हा सर्वोच्चतम गुण आहे. 25 जुन 2007 रोजी शाळांना त्यांचे सध्याचे ��ाव "राष्ट्रीय सैन्य शाळा" मिळाले. या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी सशस्त्र सेना आणि मातृभूमीची उत्कृष्ट सेवा करणार्या इतर क्षेत्रात उच्च पदांवर आहेत.
२. राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून: ६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:
येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती www.rimc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
३. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:
या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे मध्ये घेण्यात येईल.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर व संकेतस्थळावर संपर्क साधावा.
अनिस कुटटी सर (संस्थापक व कार्यवाहक)
9890826344/9604569611
Integration satta .
Address:- https://goo.gl/maps/ZXpQZ2R3ai22
🌐https://www.aneesclasses.com/
Facebook:-https://www.facebook.com/AneesClassesForNDA/
📱📲YouTube:-https://bit.ly/2mLMjKf
Instagram:https://www.instagram.com/anees_classes/
📧Gmail:-
[email protected]📱📞 09890826344 / 9604569611. For more info visit us at http://www.aneesclasses.comADCI (Anees Defence Career Institute) | Pune.
स.नं.125,साई निकेतन काॅलनी,मधुबन सोसायटी जवळ,विश्रांतवाडी,
पुणे 411015
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· वाहनांमधून होणारं ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा करणार - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.
· सीएनजी वरील व्हॅट कपातीची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी.
· उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात औरंगाबादची स्वतंत्र ओळख - उद्योगमंत्री सुभाष देसाई.
आणि
· वाढत्या महागाई विरोधात औरंगाबाद इथं महिला काँग्रेसचं आंदोलन.
****
वाहनांमधून होणारं ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात दोन महामार्गांचं लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता बनावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. या पुढे, बग्यास पासून तयार होणारं, बिटूमिन हे रस्त्यासाठी वापरलं जाणार आहे, ऊसापासून फक्त साखरे ऐवजी, इथनॉल बनवलं जावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दुष्काळी भागात खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा खर्च शासन करेल, तसंच मोफत शेततळे बांधून दिले जातील आणि जो कच्चा माल निघेल तो रस्त्यासाठी वापरला जाईल असं गडकरी यावेळी म्हणाले.
पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या १९० व्या वर्धापन दिनाच्या निमित्त गडकरी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. वाहनांना पारंपारिक वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसवले, जातील असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य सरकारनं नैसर्गिक वायू सीएनजी वरील मूल्य वर्धित कर-व्हॅट साडे तेरा टक्यांवरुन कमी करत तीन टक्के केला आहे. नवीन दर येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली.
****
उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात औरंगाबादनं स्वत:ची ओळख निर्माण केली असल्याचं, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या ऑरीक औद्योगिक नगरीमध्ये विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी आठ देशातील राजदुतांसमवेत आज ऑरिक सिटीत झालेल्या बैठकीत देसाई बोलत होते. आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीसाठी संवाद आणि सहकार्य तसंच पायाभूत सुविधांच्या उपलब्धेतसह ‘मेक इन इंडिया,’ ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमातून आंतराष्ट्रीय उद्योग उभारणीस सहकार्य आणि आवाहन करण्यात येत असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं. गुंतवणूकदारांना दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी ऑरिक सिटी शिवाय पर्याय नसून, ऑरीक औद्योगिक नगरीमध्ये उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी दिली.
दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेने अधिकारी वर्गासाठी पाच नवीन इलेक्ट्रॉनिक कार तसंच शहरातील नाले सफाई, मलबा उचलणे या कामासाठी तीन हायवा ट्रक खरेदी केले. या वाहनांचं आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.
****
अकोला जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १०९ विधवांना नाम फाउंडेशनच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी २७ लाख २५ हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या महिलांना मदतीचा हात देण्याचं कार्य उल्लेखनीय आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी अरोरा यांनी नाम फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला
****
'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम या वर्षी येत्या एक एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाचा हे पाचवं वर्ष असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेतला ताणतणाव बाजूला ठेवून परीक्षेला सामोरे कसं जावं, याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल.
****
देशभरात १०० नवीन सैनिकी शाळा स्थापन करण्यात येणार आहेत. सामाजिक संस्था, खाजगी शाळा, राज्य सरकारांच्या भागीदारीतून अशा २१ नवीन सैनिक शाळांच्या स्थापनेला सरकारने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं आणि त्यांना सशस्त्र दलात सामील होण्यासह करिअरच्या संधी उपलब्ध करून देणं, हा या मागचा उद्देश आहे.
****
देशातली आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा दोन वर्षांच्या कालावधीनंतर आज मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं मार्च २०२० मध्ये कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित केली होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन केलं जाईल. जगभरात झालेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीमुळे आणि योग्य त्या सल्लामसलतीनंतर अनुसूचित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतला आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ आजपासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. यंदा या स्पर्धेत 'लखनौ सुपर जायंट्स' आणि 'गुजरात टायटन्स' हे दोन नवे संघ खेळणार आहेत. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर आज पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
****
वाढत्या महागाई विरोधात औरंगाबाद जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आज शहरातल्या क्रांती चौक इथं आंदोलन करण्यात आलं. मागच्या आठवड्यापासून तीन वेळा इंधनाची दरवाढ झाली आहे, यामुळे जगणं कठीण झालं आहे. हे थांबवण्यासाठी, केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेल यांचा वस्तू आणि सेवाकर - जीएसटी मधे समावेश करावा अशी मागणी यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव सरोज मसलगे पाटील, जिल्ह्याध्यक्ष हेमा पाटील, शहराध्यक्षा अंजली वडजे यांनी केली. ७० वर्षात देशात एवढी महागाई कधीही वाढली नव्हती, अच्छे दिनचं स्वप्न दाखवून जनतेची घोर निराश��� केली जात असल्याची टीका काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह चौक सुशोभिकरण कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजित सिंह पाटील यांनी दिली आहे. तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत श्री क्षेत्र तुळजापूर मंदिर, मंदिर परिसर आणि शहर विकासाकरिता ३१५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत नांदेड इथं २१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पोषण आहार जनजागृती पंधरवडा अभियान राबवण्यात येत आहे. आज तरोडा बुद्रुक इथं अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी कार्यकर्तीचा मेळावा घेण्यात आला. या भागातील सामाजिक कार्यकर्त्या नंदा कल्याणकर, डॉ. प्रिती जोशी, यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केलं.
****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 January 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा. ****
आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये योग्य समन्वय असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते आज संवाद होते. उस्मानाबाद, हिंगोलीचे नंदुरबार, गडचिरोली, सिंधुदुर्ग, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज आकांक्षित जिल्हे देशाच्या प्रगतीतले अडथळे दूर करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या जिल्ह्यांसमोर असलेली नवी लक्ष्यं आणि आव्हानांसाठी पंतप्रधानांनी जिल्हाधिकार्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
****
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या.
संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी रंगभूमीला समर्पित महान कलावंत आपण गमावला असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
****
मुंबईत ताडदेव भागातल्या एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या १३ गाड्यांच्या सहाय्यानं आग विझवण्यात आली. आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकले आहेत का, याचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
विविध जिल्ह्यांच्या आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारुप विकास आराखड्याला, अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत पवार यांनी, औरंगाबाद जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी ३८५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला, बीड ३६० कोटी रुपये, लातूर २९० कोटी रुपये, परभणी २४० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास, मंजुरी दिली. नांदेड जिल्हा नियोजन विभागाला आगामी वर्षासाठी ३०३ कोटी ५२ लाख रुपये मर्यादेत, आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र जिल्ह्याचा विस्तार तसंच विकास कामांची अत्यावश्यकता लक्षात घेता, वाढीव तरतुदीचा आग्रह पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत लावून धरल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली इथं झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. एकूण पंधरा संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचं अप्रतिम सादरीकरण केलं. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणार्या मुख्य सोहळ्यात,"महाराष्ट्रातील जैवविविधता आणि जैव मानके" या विषयावरचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
****
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्या दुकानांवर लादलेले अनावश्यक निर्बंध न हटवल्यास, कोरोना प्रतिबंधक औषधांची विक्री बंद करण्याचा इशारा, राज्य औषध विक्रेते संघटनेनं दिला आहे. कोरोनाचे होम टेस्टिंग किट ज्या ग्राहकांना विकले आहेत त्यांची संपूर्ण माहिती ठेवणं, या औषध विक्रत्यांवर बंधनकारक करण्यात आलं आहे. या किटची ऑनलाईन विक्री जोरात सुरु असून, त्यावर कोणतेही निर्बंध नसताना औषध विक्रेत्या दुकानांवरचं ही सक्ती का अशी विचारणा संघटनेनं केली आहे.
****
औरंगाबाद शहरात सिडकोतल्या कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी, त्यांच्या नावाने ग्रामीण भागातल्या युवक- युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करावी, अशी मागणी, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन काल त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना दिलं. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर आणि सन्मान सैनिकी शाळाच असेल; या शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच, तसंच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं जलिल यांनी नमूद केलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्यानं नांदेडच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागानं येत्या २६ ते २९ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेदवारांनी, नोंदणी करण्याचं आवाहन, सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात २६ जानेवारीपासून आठवडाभर तापमानात घट होण्याची शक्यता, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान संशोधन कें���्रानं वर्तवली आहे.
****
0 notes
साळेगाव येथील उत्कर्ष ओव्हाळ याची सैनिक स्कूलसाठी निवड
साळेगाव येथील उत्कर्ष ओव्हाळ याची सैनिक स्कूलसाठी निवड
गौतम बचुटे/केज :- साळेगाव ता केज येथील विद्यार्थी उत्कर्ष ओव्हाळ याची चंद्रपूर येथील सैनिकी शाळा ( मिलिटरी स्कुल) साठी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे.
साळेगाव ता. केज येथील उत्तम ओव्हाळ यांचे चिरंजीव उत्कर्ष ओव्हाळ याची संरक्षण मंत्रालय संचलित सैनिकी शाळा (मिलिटरी स्कूल) सोसायटी मार्फत व एनटीएने इयत्ता ६ वी प्रवेशासाठी फेब्रुवारी २०२१ रोजी घेतलेल्या देश पातळीवर घेतलेल्या प्रवेश चाचणी…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 August 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· देशातील चार लाख महिला स्वयंसहायता गटांना एक हजार ६२५ कोटी रूपयांचा भांडवल समर्थन निधी देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.
· राज्यातील चार युवकांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान.
· शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासन निर्णय जारी.
· राज्यात सहा हजार ३८८ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ११ जणांचा मृत्यू तर ३३० बाधित.
· राष्ट्रीय सेवा योजनेत गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाची सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून तर लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयाची सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड.
आणि
· इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या ३ बाद २७६ धावा.
****
देशातील चार लाख महिला स्वयंसहायता गटांना एक हजार ६२५ कोटी रूपयांचा भांडवल समर्थन निधी देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घोषणा केली. आत्मनिर्भर नारीशक्ती से संवाद’ या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे त्यांनी स्वयं सहायता गटाच्या तसंच अन्य महिलांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याशिवाय सात हजार ५०० स्वयंसहायता सदस्यांना बियाणांसाठी २५ कोटी रूपयांची मदत, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत प्रोत्साहन म्हणून ७५ शेतकरी उत्पादक संघटनांना निधी म्हणून सुमारे चार कोटी रूपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या महिलांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण, आरोग्य, पोषणासह अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार संपूर्ण संवेदनशीलतेनं काम करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले -
कृषी-अकृषी आधारीत उद्योग हमेशा से ऐसा क्षेत्र है जहां महिला सेल्फ हेल्प ग्रुप के लिए अनंत संभावनायें अनेक काम के लिए विशेष फंड बनाया गया है। इस फंड से मदत लेकर सेल्फ ह���ल्प ग्रुप भी ये सुविधाएं तयार कर सकते है। बढिया पॅकेजिंग मे आसानी से शहरों तक अपने उत्पाद बेच सकते है। इतना ही नही भारत सरकार मे भी जेम पोर्टल है, जी ई एम, आप उस पोर्टल पे जा कर के सरकार को जो चिजें खरीदनी है, अगर आप के पास वो चिजे हैं तो आप सीधा सरकार को भी बेच सकते है।
****
महाराष्ट्रातल्या चार युवकांना विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी काल केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुण्यातला सौरभ नवांदे आणि चेतन परदेशी तसंच जळगावच्या रणजितसिंह राजपूत यांना वर्ष २०१७-२०१८ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारानं तर नागपूरच्या सिध्दार्थ रॉय यांना वर्ष २०१८-२०१९ च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देशातली युवाशक्ती हीच देशाचा वर्तमान आणि भविष्य असून युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सामील करून घेणं हा राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कारांचा हेतू असल्याचं केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी यावेळी नमुद केलं.
****
आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत “फिट इंडिया फ्रीडम रन 2.0” चा प्रारंभ आज होणार आहे. लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता आणि रोगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी नागरिक या धावण्याच्या मोहिमेत प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात.
यासाठीची नोंदणी फिट इंडिया च्या संकेतस्थळावर आजपासून सुरू होत आहे. येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणाऱ्या या “तंदुरुस्त भारत स्वातंत्र्य दौड” उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे.
****
राज्य सरकारनं शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. गत आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एकवेळची बाब म्हणून ही शुल्क कपात करावी असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. या पुर्वी ज्या पालकांनी शुल्क जमा केलं आहे असं अतिरिक्त शुल्क पुढच्या महिन्यात किंवा तिमाही हप्त्यांमध्ये किंवा पुढच्या वर्षी शाळा व्यवस्थापनानं समायोजित करावं किंवा हे शक्य नसल्यास शुल्क परत करावं, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी सज्ज असायला हवं. त्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी पाठविलेल्या व्हेंटिलेटरचे लोकार्पण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ते म्हणाले –
दुसरी लाट संपलेली आहे, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. व्हेंटीलेटर पेशंटला लावावं लागावं अशी माझी इच्छा नाहीये. एवढं उदंड आयुष्य प्रत्येकाला मिळालं पाहिजे, चांगली प्रकृती प्रत्येकाची राहिली पाहिजे. पण दुर्दैवानं एखादी व्यक्ती बेडवर आल्यानंतर त्याला व्हेंटीलेटर नाही आणि व्हेंटीलेटर मुळे तो दगावला, असं कुठेही होऊ नये. त्याचं भाग ठेवून, आदित्य साहेबांनी हा आरोग्याचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामधे राबवलेला आहे. तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपण राबवावा एवढीच सूचना करतो.
दरम्यान, वार्ताहरांशी बोलतांना सामंत यांनी कोविड १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेत विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करावी असं सांगितलं. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात प्रत्यक्ष तासिका सुरू करता येतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
परभणीत वार्ताहरांशी बोलतांना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोविड १९ची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे कोविडची स्थिती पाहून महाविद्यालय सुरू करावेत की नाही या संदर्भातला अहवाल सादर करावा अशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं सांगितलं.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोविड चाचणी प्रयोग शाळेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणू संसर्ग काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सामंत यांच्या हस्ते काल सन्मानित करण्यात आलं.
****
राज्यात काल सहा हजार ३८८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ७५ हजार ३९० झाली आहे. काल २०८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३४ हजार ५७२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक अकरा शतांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ३९० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६१ लाख ७५ हजार १० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ६२ हजार ३५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३३० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या सात, उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन, तर औरंगाबाद जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १५४ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ९२, लातूर ३७, औरंगाबाद २८, जालना ११, नांदेड सहा तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
****
राज्यातल्या शेतमालाला विदेशात बाजारपेठ मिळावी आणि शेतमालाची सुलभतेनं निर्यात करता यावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून लवकरच राज्य स्तरावर यासाठी कृती दल नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिक इथं काल आदिवासी शेतकऱ्यांचा रानभाजी महोत्सव सुरु झाला, त्यावेळी ते बोलत होते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्याही आवश्यक आहेत. यामुळे रानभाज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशाप्रकारचं प्रदर्शन भरवण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
परभणीतही कृषी विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं ठिकठिकाणी तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
****
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाची सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून निवड झाली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जाहीर झाला. निःस्वार्थ भावनेनं आणि निष्ठेनं समाजाची सेवा केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारा अंतर्गत लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयाची निवड सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून झाली असून याच महाविद्यालयाचे डॉक्टर कल्याण सावंत यांची सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून निवड झाली आहे. जालन्याच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे डॉक्टर सोमीनाथ खाडे यांना प्रशंसा प्रमाणपत्र घोषित झालं आहे. परभणीच्��ा कृषी महाविद्यालयातील सिद्धी देसाई, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अमोल सरोदे तसंच औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तेजस्विनी वानखेडे यांना सर्वोकृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
सैन्य दलातल्या अधिकारी वर्गात मराठी टक्का वाढावा, या उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९७७ साली औरंगाबाद इथं सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट - सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन केली. अकरावी- बारावीतच विद्यार्थ्यांकडून सैन्यात दाखल होण्याच्या दृष्टीनं, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या या संस्थेनं, भारतीय सैन्य दलाला आतापर्यंत सहाशेहून अधिक अधिकारी दिले, यामध्ये वायूदलातल्या ११४ वैमानिकांचा समावेश आहे. कर्नल अमित दळवी यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या संस्थेत कॅडेट्सची तयारी कशी करून घेतली जाते, याबाबत संस्थेचे प्रबंधक राजीव मानेकर यांनी अधिक माहिती दिली –
सर्विस सलेक्शन बोर्ड याच्यातील ट्रेनिंग करता त्यांना शिकवण्या असतात. ग्रुप डिस्कशनमधे कसं बोलायचं, काय बोलायचं. टास्क म्हणजे. कसं बसायचं. कशा प्रकारे बिहेव्ह करायचं. स्पेशलाईज, जी ऑफिसेस डिफेन्समधे, एस एस बी मधे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि रिटायर झालेले आहेत, त्यांना मग बोलावून त्यांच्यात जे गुण आहेत त्यांना फक्त पॉलिश केलं जातं. एस एस बी मधे कशा प्रकारे काय काय केलं पाहिजे, काय काय ॲव्हाईड केलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्यांना दहा ते पंधरा दिवस ट्रेनिंग दिलं जातं.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतानं ३ बाद २७६ धावा केल्या आहेत. ऐतिहासिक महत्व असलेल्या लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर शतक करत के. एल. राहूलने नवा विक्रम केला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा के एल राहूल १२७ तर अजिंक्य रहाणे एका धावेवर खेळत आहेत.
****
मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीचा प्रत्येक गरजू लाभार्थ्याला लाभ मिळावा आणि प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी यासाठी तेलंगणाप्रमाणे आर्थिक तरतुद अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. या संबंधित एका बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-बार्टीमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं मार्गदर्शन मिळावं यासाठी पंचतारांकित अभ्यास केंद्र पुणे इथं उभारण्याचं विचाराधीन असून यासाठी जागा उपलब्धतेनुसार आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही ते म्हणाले.
****
0 notes
How to join NDA ( national Defence Academy)?
*How to join NDA (National Defence Academy)?* 🇮🇳 🇮🇳 _*तयारी एन.डी.ए ची…!!!*_ महाराष्ट्रातील अधिकाधिक तरूणांना लष्कर अधिकारी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध. महाराष्ट्राने नव्हे संपूर्ण देशाने अनुभवलेले महापूर असो किंवा ढासळलेला कायदा व सुरक्षा स्थिती असो देशासाठी काहीही करण्यासाठी लष्कर तयार असतात. *अनिस अकॅडमी* *विश्रांतवाडी,पुणे 411015* या संस्थेची स्थापना सन 1988 साली झालेली असून विश्रांतवाडी पुणे येथे प्रशिक्षण केंद्र आहे.येथे विद्यार्थ्यांना इ.8वी ते इ.12वी पर्यंत शिक्षण देण्यात येते. येथे शालेय अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. मध्ये प्रवेश व मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. आजपर्यंत या संस्थेचे 550 पेक्षा अधिक सैन्य अधिकारी आर्मी, एअरफोर्स मध्ये कार्यरत आहेत. एप्रिल 2019 मध्ये झालेल्या परिक्षेत अनिस अकॅडमी मधून आठ मुलांची आॅफिसरसाठी निवड झालेली आहे. संपूर्ण देशभरातून साधारणपणे 400 मुलांची निवड केली जाते.त्यातून अनिस अकॅडमीतून या 8 मुलांची निवड झाली आहे. 1)रोहन बोराटे-सातारा 2)विवेक झाडे-नाशिक 3)आयुष मिश्रा-दिल्ली 4)तेजस अनभुले-सातारा 5)स्वरूप शेटे- कोल्हापूर 6)रवि केजभट- जालाना 7)संगमेश माळवदे- परभणी 8)पियुष थोरवे- नाशिक आमच्या संस्थेमध्ये शिक्षणाबरोबरच राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाते. सध्या संस्थेमध्ये 70 पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. पुण्यातील तसेच संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. लवकरच आमची संस्था स्व:ताची शाळा सुरु करणार आहे ज्यात सैनिकी शिक्षण व स्पर्धा परीक्षेवर अधिक भर राहणार आहे. लष्कर अधिकारी तयार करणारी नामवंत संस्था गेली 31वर्ष दिवसरात्र कार्यरत आहे. ही माहिती जास्तीत+ जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल. देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते. भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच _*"National Defence Academy (NDA) / एन.डी.ए."*_ च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए., खडकवासला, पूण��� येथे करवून घेतली जाते. _*पात्रता:*_ _*शैक्षणिक पात्रता:*_ एन.डी.ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे. _*वयोमर्यादा:*_ एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय - साडे सोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे. _*निवड प्रक्रिया:*_ एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय. _*प्रवेश परीक्षा:*_ एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते. _*सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:*_ भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते. _*पहिला टप्पा:*_ या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात. _*दुसरा टप्पा:*_ या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group Tasks) व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चर्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test (PABT) ही आणखी एक चाचणी होते. मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो. _*एन.डी.ए. मधील प्रशिक्षण:*_ एन.डी.ए. मधील प्रशिक्षण कालावधी हा बी. एस. सी. तीन तर बी. ई. चार वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए. मधील बी. एस. सी. चा तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो तर बी. ई. 8 टर्म मध्ये. येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी अधिकार्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.ए. चे तीन / चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.ए. च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.ए. च्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए. हा सर्वोत्तम पर्याय आहे. _*सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:*_ एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते. सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी. कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या मैनेजमेंट कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते. _*अर्ज कधी करावे:*_ जून मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए. प्रवेशासाठी परीक्षा दि. सप्टेंबर मध्ये घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची अंतिम तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.ए. च्या तयारीसाठी करावा. _*शालेय विद्यार्थ्यांसाठी:*_ सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए. मध्ये दाखल होऊ शकतात. एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. _*या काही दर्जेदार शिक्षण देणार्या सर्वोत्तम संस्थापैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती:*_ 🇮🇳 _*१. सैनिक स्कूल, सातारा: ५वी व ८वी च्या विद्यार्थांसाठी:*_ येथे विद्यार्थ्यांना इ. ६वी व ९वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी इ. ५वी व ८वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती _*www.sainiksatara.org*_ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. *RMS* केंद्र, 1, बेंगळुरू,2 बेळगाव, 3 अजमेर, 4 धोलपूर, 5 चाईल, संरक्षण सैन्याच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय सैन्य शाळा पूर्व जॉर्ज जॉर्जच्या रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल म्हणून स्थापित केल्या गेल्या. १ 195 .२ मध्ये, शाळा सार्वजनिक शाळेच्या धर्तीवर पुनर्रचना करण्यात आल्या आणि संरक्षण सेवा अधिकारी आणि नागरिक यांच्या मुलासाठी प्रवेश खुले करण्यात आले. १ 195 .4 मध्ये ही शाळा भारतीय पब्लिक स्कूल कॉन्फरन्स (आयपीएससी) ची सदस्य बनली आणि आजपर्यंत ती एक सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहे. १ 66 in66 मध्ये या शाळांचे नाव मिलिटरी स्कूल असे ठेवण्यात आले आणि त्याचे जुने ब्रीदवाक्य, 'प्ले द गेम' बदलून 'शीलेम परम भूषणम' ठेवले गेले, ज्याचा अर्थ म्हणजे चरित्र हा सर्वोच्चतम गुण आहे. 25 जुन 2007 रोजी शाळांना त्यांचे सध्याचे नाव "राष्ट्रीय सैन्य शाळा" मिळाले. या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी सशस्त्र सेना आणि मातृभूमीची उत्कृष्ट सेवा करणार्या इतर क्षेत्रात उच्च पदांवर आहेत. _*२. राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून: ६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:*_ येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती _*www.rimc.gov.in*_ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. _*३. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:*_ या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन _*www.spiaurangabad.com*_ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे मध्ये घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर व संकेतस्थळावर संपर्क साधावा. अनिस कुटटी सर (संस्थापक व कार्यवाहक) 9890826344/9604569611 Integration satta . https://www.youtube.com/watch?v=vDv504JZ4Q0 🏢Address:- https://goo.gl/maps/ZXpQZ2R3ai22 🌐https://www.aneesclasses.com/ Facebook:-https://www.facebook.com/AneesClassesForNDA/ 📱📲YouTube:-https://bit.ly/2mLMjKf 📧Gmail:-
[email protected] Instagram: https://www.instagram.com/anees_classes Twitter- https://twitter.com/KuttyAnees linkedin:- https://www.linkedin.com/in/anees-kutty-78467050/ pinterest:- https://in.pinterest.com/aclasses0583/ स.नं.125,साई निकेतन काॅलनी,मधुबन सोसायटी जवळ,विश्रांतवाडी, पुणे 411015
0 notes
How to join NDA ( national Defence Academy)?
*How to join NDA (National Defence Academy)?* 🇮🇳 🇮🇳 _*तयारी एन.डी.ए ची…!!!*_ महाराष्ट्रातील अधिकाधिक तरूणांना लष्कर अधिकारी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध. महाराष्ट्राने नव्हे संपूर्ण देशाने अनुभवलेले महापूर असो किंवा ढासळलेला कायदा व सुरक्षा स्थिती असो देशासाठी काहीही करण्यासाठी लष्कर तयार असतात. *अनिस अकॅडमी* *विश्रांतवाडी,पुणे 411015* या संस्थेची स्थापना सन 1988 साली झालेली असून विश्रांतवाडी पुणे येथे प्रशिक्षण केंद्र आहे.येथे विद्यार्थ्यांना इ.8वी ते इ.12वी पर्यंत शिक्षण देण्यात येते. येथे शालेय अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. मध्ये प्रवेश व मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. आजपर्यंत या संस्थेचे 550 पेक्षा अधिक सैन्य अधिकारी आर्मी, एअरफोर्स मध्ये कार्यरत आहेत. एप्रिल 2019 मध्ये झालेल्या परिक्षेत अनिस अकॅडमी मधून आठ मुलांची आॅफिसरसाठी निवड झालेली आहे. संपूर्ण देशभरातून साधारणपणे 400 मुलांची निवड केली जाते.त्यातून अनिस अकॅडमीतून या 8 मुलांची निवड झाली आहे. 1)रोहन बोराटे-सातारा 2)विवेक झाडे-नाशिक 3)आयुष मिश्रा-दिल्ली 4)तेजस अनभुले-सातारा 5)स्वरूप शेटे- कोल्हापूर 6)रवि केजभट- जालाना 7)संगमेश माळवदे- परभणी 8)पियुष थोरवे- नाशिक आमच्या संस्थेमध्ये शिक्षणाबरोबरच राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाते. सध्या संस्थेमध्ये 70 पेक्षा जास्त शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. पुण्यातील तसेच संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. लवकरच आमची संस्था स्व:ताची शाळा सुरु करणार आहे ज्यात सैनिकी शिक्षण व स्पर्धा परीक्षेवर अधिक भर राहणार आहे. लष्कर अधिकारी तयार करणारी नामवंत संस्था गेली 31वर्ष दिवसरात्र कार्यरत आहे. ही माहिती जास्तीत+ जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल. देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्��णजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते. भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच _*"National Defence Academy (NDA) / एन.डी.ए."*_ च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए., खडकवासला, पूणे येथे करवून घेतली जाते. _*पात्रता:*_ _*शैक्षणिक पात्रता:*_ एन.डी.ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत अस��वा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. ��्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे. _*वयोमर्यादा:*_ एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय - साडे सोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे. _*निवड प्रक्रिया:*_ एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय. _*प्रवेश परीक्षा:*_ एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते. _*सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:*_ भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते. _*पहिला टप्पा:*_ या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात. _*दुसरा टप्पा:*_ या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group Tasks) व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चर्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test (PABT) ही आणखी एक चाचणी होते. मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो. _*एन.डी.ए. मधील प्रशिक्षण:*_ एन.डी.ए. मधील प्रशिक्षण कालावधी हा बी. एस. सी. तीन तर बी. ई. चार वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए. मधील बी. एस. सी. चा तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो तर बी. ई. 8 टर्म मध्ये. येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी अधिकार्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.ए. चे तीन / चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.ए. च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.ए. च्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए. हा सर्वोत्तम पर्याय आहे. _*सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:*_ एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते. सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी. कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भर���ूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या मैनेजमेंट कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते. _*अर्ज कधी करावे:*_ जून मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए. प्रवेशासाठी परीक्षा दि. सप्टेंबर मध्ये घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची अंतिम तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.ए. च्या तयारीसाठी करावा. _*शालेय विद्यार्थ्यांसाठी:*_ सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए. मध्ये दाखल होऊ शकतात. एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. _*या काही दर्जेदार शिक्षण देणार्या सर्वोत्तम संस्थापैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती:*_ 🇮🇳 _*१. सैनिक स्कूल, सातारा: ५वी व ८वी च्या विद्यार्थांसाठी:*_ येथे विद्यार्थ्यांना इ. ६वी व ९वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी इ. ५वी व ८वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती _*www.sainiksatara.org*_ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. *RMS* केंद्र, 1, बेंगळुरू,2 बेळगाव, 3 अजमेर, 4 धोलपूर, 5 चाईल, संरक्षण सैन्याच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय सैन्य शाळा पूर्व जॉर्ज जॉर्जच्या रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल म्हणून स्थापित केल्या गेल्या. १ 195 .२ मध्ये, शाळा सार्वजनिक शाळेच्या धर्तीवर पुनर्रचना करण्यात आल्या आणि संरक्षण सेवा अधिकारी आणि नागरिक यांच्या मुलासाठी प्रवेश खुले करण्यात आले. १ 195 .4 मध्ये ही शाळा भारतीय पब्लिक स्कूल कॉन्फरन्स (आयपीएससी) ची सदस्य बनली आणि आजपर्यंत ती एक सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहे. १ 66 in66 मध्ये या शाळांचे नाव मिलिटरी स्कूल असे ठेवण्यात आले आणि त्याचे जुने ब्रीदवाक्य, 'प्ले द गेम' बदलून 'शीलेम परम भूषणम' ठेवले गेले, ज्याचा अर्थ म्हणजे चरित्र हा सर्वोच्चतम गुण आहे. 25 जुन 2007 रोजी शाळांना त्यांचे सध्याचे नाव "राष्ट्रीय सैन्य शाळा" मिळाले. या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी सशस्त्र सेना आणि मातृभूमीची उत्कृष्ट सेवा करणार्या इतर क्षेत्रात उच्च पदांवर आहेत. _*२. राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून: ६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:*_ येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती _*www.rimc.gov.in*_ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. _*३. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:*_ या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन _*www.spiaurangabad.com*_ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे मध्ये घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर व संकेतस्थळावर संपर्क साधावा. अनिस कुटटी सर (संस्थापक व कार्यवाहक) 9890826344/9604569611 Integration satta . https://www.youtube.com/watch?v=vDv504JZ4Q0 🏢Address:- https://goo.gl/maps/ZXpQZ2R3ai22 🌐https://www.aneesclasses.com/ Facebook:-https://www.facebook.com/AneesClassesForNDA/ 📱📲YouTube:-https://bit.ly/2mLMjKf 📧Gmail:-
[email protected] Instagram: https://www.instagram.com/anees_classes Twitter- https://twitter.com/KuttyAnees linkedin:- https://www.linkedin.com/in/anees-kutty-78467050/ pinterest:- https://in.pinterest.com/aclasses0583/ स.नं.125,साई निकेतन काॅलनी,मधुबन सोसायटी जवळ,विश्रांतवाडी, पुणे 411015
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 February 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २३ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि. **** नांदेड- लातूर रोड- गुलबर्गा रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; आवश्यकता भासल्यास ५० टक्के निधी देण्याची राज्याची तयारी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभर विशेष मोहीम शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच आता शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरूद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं ६६ धावांनी जिंकला **** नांदेड- लातूर रोड- गुलबर्गा हा रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा केला जाईल तसंच आवश्यकता भासल्यास राज्य शासन ५० टक्के आर्थिक सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी दिली आहे. लातूर जिल्हा पॅकेज अंतर्गत अहमदपूर इथं ११ हजार ६८० कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमीपूजन त्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्यानं जलसंधारण क्ष��त्रात भरीव कामगिरी करून देशपातळीवर प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलतांना, पिंजर -दमणगंगा प्रकल्प आणि तापी- नर्मदा प्रकल्प पूर्ण झाल्यास, या प्रकल्पातलं पाणी गोदावरी नदीत सोडून जायकवाडी प्रकल्पात आणलं जाणार आहे. त्यामुळं मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटेल आणि जवळपास साडेपाच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असं सांगितलं. नांदेड इथं भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. केंद्र आणि राज्य सरकारनं गरीबांसाठी कल्याणकारी योजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलतांना केला. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, रस्ते विकास, रेल्वे प्रकल्प विकास, अशा योजनांच्या यशोगाथा सर्वसामान्यापर्यंत पोचवण्याचं आवाहन फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं. बीड जिल्ह्यात परळी इथं गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व्दारा आयेाजित ८९ जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यालाही मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बडेजाव टाळून होत असलेला हा सामुदायिक विवाह सोहळा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं सांगितलं. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सिनेअभिनेता अक्षय कुमार, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनेते अक्षयकुमार यांनी नवविवाहित जोडप्याला प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत केली तर दहशतवाद्यांच्या हल्ल्याल���या शहिदांसाठी एक कोटी रूपयांची मदत ही त्याने मुख्यमंत्र्याकडे दिली. **** मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट आय एन या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा तसंच चौकशीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान, दिव्यांग मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं, यासाठी राज्य निवडणूक आयोगानं, त्यांना मोफत वाहतुक सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी, दिव्यांग मतदारांना, त्यांच्या घरापासून मतदान केंद्रावर जाण्या- येण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिलं जाईल. राज्यातल्या ४८ लोकसभा मतदार संघातल्या दोन लाख २४ हजार १६२ दिव्यांग मतदारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. **** नव्व्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं काल सायंकाळी नागपूर इथं जेष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्धाटन झालं. नाटककार प्रेमानंद गज्वी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. यावेळी बोलतांना एलकुंचवार यांनी राज्यकर्ते कधीही सहिष्णू नसतात, असं सांगत धर्म हा व्यापक आणि गहन विषय आहे असं सांगितलं. नाट्यदिंडीनं संमेलनाचा प्रारंभ झाला. या चार दिवसीय नाट्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र तसंच नाट्य प्रवेशांचं सादरीकरण केलं जाणार आहे. **** राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावासह सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असं आश्वासन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. परभणी इथं राज्यस्तरीय कृषी आणि पशू पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते काल बोलत होते. सततची नापिकी, दुष्काळ ही संकटं शेतकऱ्यांपुढे उभी असल्यामुळे, शेतकरी जगला पाहिजे, हे धोरण शासनानं अवलंबलं, तरच शेतकरी तरेल. असंही मुंडे यावेळी म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच आता शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातल्या अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतल्या पू शिक्षक तसंच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे. **** धर्म हा जगभर विभाजक आहे, अस्मितेचं साधन बनतो आहे आणि जगाला संकटाच्या खाईकडे नेण्याचं साधन बनतो आहे, म्हणून सद्य:स्थितीत महात्मा गांधी यांच्या सर्व धर्मसमभावाची संकल्पना गरजेची असल्याचं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दिनकर बोरीकर स्मृती व्याख्यान मालेत, ‘महात्मा गांधीजींची धर्म आणि सर्वधर्म समभावाची संकल्पना’ या विषयावर पहिलं पुष्प काल त्यांनी गुंफलं. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक जीवनात धर्म अटळ असून सर्व धर्माच्या चांगल्या मूल्यांचा संग्रह आपआपल्या धर्मात होणे गरजेचं असल्याचं राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी म्हणत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. **** बचत गटांच्या उत्पादनांच्या व्यापक विक्रीसाठी कायमस्वरुपी विक्री दालन निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित बचत गटांच्या उत्पादीत वस्तूंचं विभागस्तरीय प्रदर्शन आणि विक्री ‘सिद्धा महोत्सव २०१८-१९’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रशासनानं प्रथम या बचत गटांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी असं त्यांनी सूचित केलं. विभाग आणि जिल्हा स्तरावरच्या बचत गटांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. **** भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर ६६ धावांनी विजय मिळवला. काल मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात, भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत, इंग्लंड संघासमोर २०३ धावांचं लक्ष्य ठेवलं, मात्र इंग्लंडचा संघ ४१ व्या षटकांत अवघ्या १३६ धावांवर सर्वबाद झाला. आठ षटकांत २५ धावा देत चार बळी घेणारी भारताची एकता बिष्ट, सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. **** उस्मानाबाद शहरात बार्शी नाका, जिजाऊ चौक, इथं महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या शाखेचा येत्या २ मार्चपासून शुभारंभ होत आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमुळं अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी या बँकेची उस्मानाबाद इथं शाखा सुरू करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रयत्न केले होते. **** औरंगाबाद इथं आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियांनाअंतर्गत आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या खडकेश्वर इथल्या मैदानावर हा मेळावा होत असून रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केले जाणार आहेत. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत रूग्णांनी नोंदणी करावी असं आवाहन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. **** दुष्काळातल्या शेतकऱ्यांना मदत करायचीच असेल तर उदार मनाने करावी त्यासाठी अटी आणि शर्तींचं काय काम असा सवाल करत खासदार नारायण राणे यांनी राज्यातल्या सरकारवर टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातल्या वाडीकुरोली इथं आयोजित कै. वसंतराव काळे यांच्या अमृत महोत्सवी शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे होते. शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना चारा छावण्यासाठी अटी आणि शर्ती लागू केल्याचं सांगून सरकारनं याबाबत फेरविचार करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ***** ***
0 notes
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १६ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी धुळे इथं कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘निम्न पांझरा’ प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. धुळे तसंच यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध योजनांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड इथं, एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत, आदिवासी मुला-मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं उद्धाटनही पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते नव्या घराचा ताबा देणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस तसंच अजनी-पुणे रेल्वेगाडीला दूरदृष्य संवाद यंत्रणेनं हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. **** जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आज सकाळपासून रेल रोको आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. **** जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मुकुंदराज कलशेट्टी यांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं लाच घेताना रंगेहात पकडलं. ऊसाला कालव्यातून पाणी सोडण्यासाठी कलशेट्टी यानं, तक्रारदार शेतकऱ्यांकडून चार हजार रुपये लाच मागितली होती. पाथरी उपविभागीय कार्यालयात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** राज्यभरात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृती परीक्षा आणि अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश पुनर्परीक्षा, येत्या २४ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. सर्वत्र एकाच दिवशी होणाऱ्या या दोन्ही परीक्षा देणं विद्यार्थ्यांना सोयीचं होण्यासाठी शिष्यवृती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ***** ***
0 notes