TET SCAM : पुणे जिल्ह्यातील 'त्या' गुरुजींच्या कागदपत्रांची तपासणी सुरू; झेडपीत आज हजर झाले ६० शिक्षक
TET SCAM : पुणे जिल्ह्यातील ‘त्या’ गुरुजींच्या कागदपत्रांची तपासणी सुरू; झेडपीत आज हजर झाले ६० शिक्षक
TET SCAM : पुणे जिल्ह्यातील ‘त्या’ गुरुजींच्या कागदपत्रांची तपासणी सुरू; झेडपीत आज हजर झाले ६० शिक्षक
Pune zilha parishad teacher documents checking : पुणे जिल्हा परिषदेने शिक्षण सेवकांच्या कागद पत्रांची तपासणी सुरू केली आहे. आज ६० शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. यात त्याच्या टीईटी प्रमाण पत्राचा देखील समावेश आहे.
Pune zilha parishad teacher documents checking : पुणे जिल्हा…
View On WordPress
0 notes
मोठी बातमी : दिंडोरी अवताडे शिवारात कॅरेटच्या गोडाऊनला भीषण आग..
0 notes
विश्लेषण : भंडारा जिल्ह्यातील भेळ प्रकल्पाचे काय होणार? | भंडारा जिल्ह्यातील भेळ प्रकल्प प्रिंट एक्स्प्रेस SSCG
विश्लेषण : भंडारा जिल्ह्यातील भेळ प्रकल्पाचे काय होणार? | भंडारा जिल्ह्यातील भेळ प्रकल्प प्रिंट एक्स्प्रेस SSCG
-राजेश्वर ठाकरे
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा (भेल) वीजनिर्मितीसाठी लागणाऱी उपकरणे तयार करण्याचा प्रकल्प ९ वर्षांपासून रखडला आहे. सध्या प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीवर गुरे चरताना दिसतात. आता तर सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प गुंडाळण्याचेच धोरण केंद्राने स्वीकारल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काय होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
काय आहे हा प्रकल्प?
२०१३ च्या…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला, येत्या शनिवारी होणार मतदान
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
आणि
धाराशिव जिल्ह्यातील २१ टक्के पाणी नमुने दूषित
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून, ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. यंदा मान्सून आपल्या १ जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच दोन दिवस आधी दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह, ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल, असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल, तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या २ जून पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी सहा वाजता संपला. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यात बिहारमधल्या ८, हिमाचल प्रदेशातल्या ४, झारखंडच्या ३, ओडिशातल्या ६, पंजाबमधल्या सर्व १३, उत्तरप्रदेशातल्या १३, पश्चिम बंगालमधल्या ९ आणि चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्यात ४२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होईल. तसंच आंध्रप्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील ४ जून रोजी होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ जून रोजी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, मद्रास च्या स्टार्टअप, अग्निकुल कॉसमॉसच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतूक करुन त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अग्निबाण रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घटना असून, याद्वारे सिंगल-पीस त्रिमितीय अर्थात थ्री डायमेंशनल प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिलं रॉकेट लॉन्च केलं गेलं आहे. तसंच हे यशस्वी काम हा आमच्या बुद्धिमान युवा पिढीचा पुरावा आहे, असं मत ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं.
****
दिल्लीतल्या अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली. त्यात अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला न्यायालायानं नोटीस पाठवली. दरम्यान, याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या ६ जुलै पर्यंत वाढवली आहे.
****
देशातल्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एनएचएआय, अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत भारतातलं महामार्गांचं जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक मिळवण्याचा एनएचएआय चा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं, एनएचएआय चे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी शाश्वत निधी मिळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती तारण ठेवून चार महिने उलटून गेले असूनही कर्जाची रक्कम खात्यावर टाकण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले अशी दाभाडे कुटुंबीयांची तक्रार आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचं हे अपयश आहे. सरकारनं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे आणि सध्या उन्हाच्या झळा वाढल्यामुळं तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं टँकर आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील ११०२ पाणी नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता, त्यातील २३४ नमुने दूषित आढळून आले आहेत. हे प्रमाण सरासरी २१ टक्के असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं काढला आहे. तर जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींपैकी १९६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या १९६ ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितरित होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, धुळे जिल्ह्यात भाजपनं ठिकठिकाणी आंदोलने केली. भंडारा जिल्ह्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून झालेलं हे वर्तन चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल कालच माफी मागतली असून, आज त्यांनी मनुस्मृतीच्या आड लपण्यासाठी भाजप आंदोलन करीत असल्याचा आरोप केला.
****
छत्रपती संभाजनगर इंथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा कै. ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार, यंदा जिंतूर तालुक्यातल्या, बोरी येथील कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, या योजनेची सुरुवात करण्यात आली. ग्रंथभेट योजनेतील पंचवीस हजारांची पुस्तके आणि स्मृतिचिन्ह असं या योजनेचं स्वरूप आहे. वाचनालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, हा पुरस्कार प्रदान समारंभ, येत्या शनिवारी, बोरी मध्ये वाचनालय परिसरात होणार आहे. संशोधन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रा. शं. बालेकर यांनी पुरस्काराबद्दल कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाचं अभिनंदन केलं आहे.
****
सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत, जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामे करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
****
“अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारमधील लोकसहभागाचं मॉडेल बेल्जियममध्ये राबविणार असून, जागतिक तापमानबदलाचं उत्तर लोकसहभागातूनच देणं शक्य आहे”, असं मत बेल्जीअम मधील गेमबलॉस युनिव्हर्सिटीच्या, ग्रामविकास विभागातील डॉ.नाश्तासिहा गुमोचडिया यांनी व्यक्त केलं आहे. हिवरे बाजार गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पाचे आणि त्याच्या विकासाचे सूत्रधार पद्मश्री पोपटराव पवार, यांनी हिवरे बाजार गावातील विकासाचं काम आणि सामाजिक शिस्त ही समस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी अनुकरणीय आहे असा अभिप्राय देवून त्यांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.
****
उद्या जागतिक तंबाखूविरोधी दिन आहे. यानिमित्ताने उद्या शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी, उद्या तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील, जिल्हा रुग्णालयाचे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून, भारतात मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले "ते" प्रेमीयुगलच..दोघेही विवाहित
त्या प्रेमीयुगलाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश..
दोघेही विवाहित असून, ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी गावातील..
जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला आणि पुरुष असे दोघे आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह खाली घेतले. त्यानंतर…
View On WordPress
0 notes
https://marmikmaharashtra.com/inter-district-burglary-gangs-rampage-silver-ornaments-weighing-60-tolas-along-with-gold-ornaments-seized/
0 notes
https://marmikmaharashtra.com/in-just-a-few-hours-the-stolen-jcb-was-seized-the-thieves-and-buyers-from-outside-the-district/
0 notes
नांदेड जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारीत टेक्नॉलॉजी चा वापर करून ऊस डेमो प्लॉट तयार करण्याचा उपक्रम आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून संपर्क साधावा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI)
वापर करून कमी खर्चात ऊस लागवड व उत्पादन वाढ संदर्भाने शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक राबविणे असा प्रकल्प सुरू करणार आहोत तरी
इच्छुक शेतकऱ्यांनी QR कोड स्कॅन करून किंवा खाली दिलेली लिंक ओपन करून आपली नाव नोंदणी करून घ्यावी. प्रकल्पामध्ये सहभाग नोंदविण्याकरीता अंतिम दि. ५ एप्रिल २०२४* पर्यंत राहील व माहिती आपण आपल्या जवळच्या शेतकरीबांधवा पर्यंत पर्यंत नक्की पोचवा.
https://forms.gle/JKjJfXruaXV9YMcK8
या प्रकल्पामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड जिल्ह्यासाठी सहयोगी संस्था म्हणून काम करणार आहे तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रकल्पामध्ये सहभाग घ्यावा.
प्रकल्पासाठी शेतकरी निवडीचे निकष सोबत दिलेले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड
मो. 8380984068 #farm #agriculture #farmer #ClimateChange #ClimateSmartAgriculture #farming
1 note
·
View note
प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक - रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे - महासंवाद
रायगड, दि. 18 जिमाका : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रिंटर, प्रकाशक यांची बैठक आयोजित करण्यात…
View On WordPress
0 notes
Gujrat Election 2022: गुजरात निवडणुकीचा दूसरा टप्याचे आज मतदान; १४ जिल्ह्यातील ९३ जागांवर तब्बल ८३३ उमेदवार रिंगणात
Gujrat Election 2022: गुजरात निवडणुकीचा दूसरा टप्याचे आज मतदान; १४ जिल्ह्यातील ९३ जागांवर तब्बल ८३३ उमेदवार रिंगणात
Gujrat Election 2022: गुजरात निवडणुकीचा दूसरा टप्याचे आज मतदान; १४ जिल्ह्यातील ९३ जागांवर तब्बल ८३३ उमेदवार रिंगणात
Gujrat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्यातील तब्बल ९३ जागांवर हे मतदान होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मतदान करण्याची शक्यता आहे.
Gujrat Election…
View On WordPress
0 notes
भीमा शंकर आणि पुण्यातील कसबा गणपतीसह जिल्ह्यातील ७१ मंदिरांबाबत मोठा निर्णय
पुणे : मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे.सुनील घनवट पुढे म्हणाले की,…
View On WordPress
0 notes
सातारा : गोळेश्वर येथे आगीत ८० एकरातील ऊस जळून खाक
सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर क्षेत्रातील कैकाडा शिवाराला लागलेल्या आगीत सुमारे ८० एकर ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांना सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान होऊन आले. आगीत शेतकऱ्यांच्या धनवान ऊसांसाठी वापरले जाते, त्यामुळे नुकसानाची अंदाजे प्रमाणे होती. शेतकऱ्यांनी ऊसाच्या खोडव्यात आग लागल्याचे सांगितले. गोळेश्वर गावचे तलाठी सुजित थोरात यांनी घटनेची पाहणी केली आणि पंचनामा केला.
गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या तोडण्यांना सुरूच केले आहे आणि त्यात काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाचट पेटवले. आग इतर ठिकाणी पसरली आणि शेजारील ऊसांच्या खोडव्याला लागली. पोलिस आणि अग्निशामक दलाची मदत करताना पोलिस प्रशासन तसेच गवच्यातील महसूल विभागाने घटनास्थळी दाखल केली.लेख वाचण्यासाठी क्लिक करा - सातारा : गोळेश्वर येथे आगीत ८० एकरातील ऊस जळून खाक
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला, येत्या शनिवारी होणार मतदान
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
आणि
धाराशिव जिल्ह्यातील २१ टक्के पाणी नमुने दूषित
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून, ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. यंदा मान्सून आपल्या १ जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच दोन दिवस आधी दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह, ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल, असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल, तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या २ जून पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी सहा वाजता संपला. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यात बिहारमधल्या ८, हिमाचल प्रदेशातल्या ४, झारखंडच्या ३, ओडिशातल्या ६, पंजाबमधल्या सर्व १३, उत्तरप्रदेशातल्या १३, पश्चिम बंगालमधल्या ९ आणि चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्यात ४२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होईल. तसंच आंध्रप्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील ४ जून रोजी होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ जून रोजी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, मद्रास च्या स्टार्टअप, अग्निकुल कॉसमॉसच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतूक करुन त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अग्निबाण रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घटना असून, याद्वारे सिंगल-पीस त्रिमितीय अर्थात थ्री डायमेंशनल प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिलं रॉकेट लॉन्च केलं गेलं आहे. तसंच हे यशस्वी काम हा आमच्या बुद्धिमान युवा पिढीचा पुरावा आहे, असं मत ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं.
****
दिल्लीतल्या अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली. त्यात अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला न्यायालायानं नोटीस पाठवली. दरम्यान, याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या ६ जुलै पर्यंत वाढवली आहे.
****
देशातल्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एनएचएआय, अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत भारतातलं महामार्गांचं जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक मिळवण्याचा एनएचएआय चा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं, एनएचएआय चे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी शाश्वत निधी मिळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती तारण ठेवून चार महिने उलटून गेले असूनही कर्जाची रक्कम खात्यावर टाकण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले अशी दाभाडे कुटुंबीयांची तक्रार आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचं हे अपयश आहे. सरकारनं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे आणि सध्या उन्हाच्या झळा वाढल्यामुळं तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं टँकर आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील ११०२ पाणी नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता, त्यातील २३४ नमुने दूषित आढळून आले आहेत. हे प्रमाण सरासरी २१ टक्के असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं काढला आहे. तर जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींपैकी १९६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या १९६ ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितरित होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, धुळे जिल्ह्यात भाजपनं ठिकठिकाणी आंदोलने केली. भंडारा जिल्ह्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून झालेलं हे वर्तन चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल कालच माफी मागतली असून, आज त्यांनी मनुस्मृतीच्या आड लपण्यासाठी भाजप आंदोलन करीत असल्याचा आरोप केला.
****
छत्रपती संभाजनगर इंथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा कै. ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार, यंदा जिंतूर तालुक्यातल्या, बोरी येथील कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, या योजनेची सुरुवात करण्यात आली. ग्रंथभेट योजनेतील पंचवीस हजारांची पुस्तके आणि स्मृतिचिन्ह असं या योजनेचं स्वरूप आहे. वाचनालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, हा पुरस्कार प्रदान समारंभ, येत्या शनिवारी, बोरी मध्ये वाचनालय परिसरात होणार आहे. संशोधन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रा. शं. बालेकर यांनी पुरस्काराबद्दल कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाचं अभिनंदन केलं आहे.
****
सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत, जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामे करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
****
“अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारमधील लोकसहभागाचं मॉडेल बेल्जियममध्ये राबविणार असून, जागतिक तापमानबदलाचं उत्तर लोकसहभागातूनच देणं शक्य आहे”, असं मत बेल्जीअम मधील गेमबलॉस युनिव्हर्सिटीच्या, ग्रामविकास विभागातील डॉ.नाश्तासिहा गुमोचडिया यांनी व्यक्त केलं आहे. हिवरे बाजार गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पाचे आणि त्याच्या विकासाचे सूत्रधार पद्मश्री पोपटराव पवार, यांनी हिवरे बाजार गावातील विकासाचं काम आणि सामाजिक शिस्त ही समस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी अनुकरणीय आहे असा अभिप्राय देवून त्यांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.
****
उद्या जागतिक तंबाखूविरोधी दिन आहे. यानिमित्ताने उद्या शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्या��� आले आहेत. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी, उद्या तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील, जिल्हा रुग्णालयाचे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून, भारतात मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
जालना जिल्ह्यातील पुन्हा अवकाळीने झोडपले, जिल्हाभरात अवकाळीचे थैमान. Bad weather hit Jalna district again, bad weather prevailed all over the district.
अवकाळी पाऊस आणि तुफान गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान, घरावरील पत्रेही उडाले..
नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी..
जालना: मंठा तालुक्यातील उस्वद, जयपूर, एरंडेश्वर, तळणी, देवठाणा गावांना वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे जिल्हाभरात थैमान पाहायला मिळत असून मंठा उस्वद रोडवरील झाडे ही उन्मळून पडली आहेत. तर जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे…
View On WordPress
0 notes