शेगाव येथील आनंद सागर पुन्हा सुरु होणार? काय आहे त्या व्हायरल मेसेज मागील सत्य चला जाणून घेऊया!
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो, गुरुवार दि. १3 एप्रिल, शेगावचं नाव जरी काढलं तर आठवण होते ती येथील गजानन महाराज मंदिराची आणि सोबतच पर्यटकांचे आवडते प्रेक्षणीय स्थळ असलेल्या ‘आनंद सागर’ची. मात्र, शेगावचं ‘आनंद’सागर आता उदास झालंय. आनंद सागरातील सर्व खेळणी काढून टाकण्यात आली आहेत. येथील साहित्य काढून टाकण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली…
View On WordPress
0 notes
Video: तीन महिन्यांच्या मुलाला सोडून सोनम कपूरने सोडला देश… भावुक झाली अभिनेत्री
Video: तीन महिन्यांच्या मुलाला सोडून सोनम कपूरने सोडला देश… भावुक झाली अभिनेत्री
Video: तीन महिन्यांच्या मुलाला सोडून सोनम कपूरने सोडला देश… भावुक झाली अभिनेत्री
Sonam Kapoor Video: अभिनेत्री सोनम कपूर लग्नानंतर सिनेविश्वापासून काही दूर आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वीच तिने मुलगा वायूला जन्म दिला, तेव्हापासून ती मुलासोबतच वेळ घालवत होती. पण आता तिने वायूला घरी ठेवून इंटरनॅशनल ट्रीपची वाट धरली आहे. सोनमने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या भावना स्पष्ट दिसत आहेत.
Sonam Kapoor…
View On WordPress
0 notes
नोव्हेंबरअखेर ग्रामपंचायतीची रणधुमाळी?
मुंबई : राज्यात दिवाळीनंतर निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. २५ जिल्हा परिषदा, २३ महापालिका, २२० नगरपरिषदा व नगरपालिका आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत ७ महिन्यांपूर्वीच संपली आहे. पण प्रभागरचनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्याच दरम्यान आता पुढील दीड महिन्यांत तब्बल ७ हजार ६०० ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबरअखेरीस ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने तसे नियोजन केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यातील बहुतांश महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, नगरपालिकांची मुदत मार्च २०२२ पर्यंत संपलेली आहे. मात्र, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न कोर्टात असल्याने या निवडणुका ६ महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला. मात्र, तत्कालीन सरकारने प्रभाग रचनेत केलेल्या बदलाला राज्य सरकारने आव्हान दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ दिली.
२०११ च्या जनगणनेऐवजी सध्याची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचनेत बदल करण्यात आला व प्रभाग रचनाच बदलली. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात १९ ऑक्टोबरला सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिल्याने नोव्हेंबरच्या मध्यात सुनावणी होईल. त्यादरम्यान ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या दरम्यानच साडेसात हजार ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ शकते, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेतल्या जाऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
निवडणुकांचे संभाव्य ३ टप्पे
ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत होणार असून, २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान ग्रामपंचायत निवडणुका होऊ शकतात. २० डिसेंबर ते २५ जानेवारीदरम्यान महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका, तर ३० जानेवारी ते २० फेब्रुवारीदरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Read the full article
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 August 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
· कुपोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तृणधान्या विषयी जागरूकता वाढवण्याची गरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी
· काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी येत्या १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार
· गडचिरोली जिल्ह्यात तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक
· औरंगाबादमध्ये नियोजित क्रीडा विद्यापीठाचं लवकरच भुमीपूजन - सहकार मंत्री अतुल सावे
· लेखक, कलावंतांनी सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरावा, ज्येष्ठ साहित्यिक -समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांचा आग्रह
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ६३९ रुग्ण, मराठवाड्यात ३४ बाधित
आणि
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तावर पाच गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
कुपोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी देशातील जनतेमध्ये तृणधान्या विषयी जागरूकता वाढवण्याची गरज असून, त्यासाठी लोकचळवळ उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या ९२ व्या भागात जनतेशी संवाद साधत होते. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश असून, देशाच्या विविध भागातल्या अन्नात तृणधान्यांचे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे, कोडो, कुटकी, कुट्टू, असे विविध प्रकार पाहायला मिळतात, याकडे लक्ष वेधताना, ऊर्जा तसंच जीवनसत्वांनी परिपूर्ण तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी उपयोगी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. कमी पाण्यात उत्पादन होणाऱ्या तृणधान्यांच्या आरोग्य विषयक विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख करत, शेतकऱ्यांनी तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. तृणधान्यावर प्रक्रिया उद्योग उभारलेल्या स्टार्ट-अपस्चं पंतप्रधानांनी कौतुक केलं.
आगामी सणासुदीच्या काळात तृणधान्यांपासून शिजवलेल्या पक्वान्नांची छायाचित्रं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दूरदर्शनवरून प्रसारित होणारी स्वराज मालिका आवर्जून पाहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केलं.
डिजिटल इंडिया, इंटरनेट सुविधा, पोषण मास, अमृत सरोवर, जल संरक्षण आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी संवाद साधला. मेजर ध्यानचंद यांची जयंती -राष्ट्रीय क्रीडा दिन, गणेशोत्सव, ओणम, जैन धर्मियांचं संवत्सर पर्व, या निमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी येत्या १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसुदन मिस्त्री आणि ज्येष्ठ नेते के सी वेणूगोपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या २४ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, १ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. ८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आवश्यकतेनुसार १७ ऑक्टोबरला मतदान होईल, आणि १९ ऑक्टोबरला नव्या अध्यक्षांच्या नावाची औपचा���िक घोषणा होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली. लोकशाही पद्धतीनं पक्षांतर्गत निवडणुका घेणारा काँग्रेस हा देशातला एकमेव पक्ष असल्याचं जयराम रमेश यांनी यावेळी सांगितलं.
****
महाबळेश्वर इथल्या पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. काल महाबळेश्वर इथं झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. भिलार या पुस्तकाच्या गावाला पर्यटनस्थळाचा 'क' दर्जा आहे. मात्र हे गाव 'ब' दर्जाचे पर्यटनस्थळ करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. प्रतापगड संवर्धनाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
****
विधानसभेच्या येत्या निवडणुकीनंतर राज्यात बहुमतानं शिवसेनेचं सरकार आणण्यासाठी गाव तिथं युवा सेनेची शाखा स्थापन करणार असल्याचं युवा सेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूरात बातमीदारांशी बोलत होते. येणारा काळ हा शिवसेनेचाच असणार आहे, हे पक्ष सोडून जाणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले. निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी युवासैनिकांना केलं.
****
नाशिकमधील प्रतिबंधित तोफखाना क्षेत्रात लष्कराच्या जवानांना शुक्रवारी रात्री एक ड्रोन घिरट्या घालतांना आढळलं. यासंदर्भात प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडविल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वीच नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील 'नो ड्रोन फ्लाईग झोन' घोषित करण्यात आले आहेत. त्याउपरही प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवल्याबद्दल नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
****
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखतळ्यातून राख जमा करण्यासाठी स्फोटकं वापरण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थापकाने सतर्कता दाखवत या तिघांना ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या हवाली केलं. मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी अधिक माहिती देत, यामुळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसल्याचा खुलासा केला आहे.
****
चतुरंग प्रतिष्ठानच्या गेल्या तीन वर्षांसाठीच्या जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ख्यातकीर्त दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू तथा राजदत्त यांना २०२० सालचा, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे डॉ प्रभाकर मांडे यांना २०२१ सालचा तर दुर्गभ्रमक-गिर्यारोहक बाळकृष्ण ऊर्फ आप्पा परब यांना २०२२ सालचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि तीन लाख रुपये असं या पुरस्काराचा स्वरूप आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या लाहेरी हद्दीतील जंगलातून तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. लाहेरी जिल्हा पोलीस दलाच्या विशेष अभियान पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्तपणे ही कारवाई केली. या तिघांवर एकूण दहा लाख रुपयांचे बक्षिस होते. रमेश पल्लो, तानी पुंगाटी, अर्जुन नरोटे अशी या तिघांची नावं आहेत. गेल्या दोन वर्षात ५७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
****
औरंगाबादमध्ये नियोजित क्रीडा विद्यापीठाचं भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचं आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगानं काल औरंगाबाद इथं जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा तिसरा जीवन गौरव पुरस्कार खो खो चे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि अर्जुन पुरस्कार विजेते नौकानयनपटू दत्तू भोकनळ यावेळी उपस्थित होते. खेळाडूंनी पायाभूत सुविधा नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करत आपलं ध्येय गाठण्याचं आवाहन भोकनळ यांनी केलं. यावेळी जिल्हाभरातील विविध राष्ट्रीय आणि आतंराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेले खेळाडू आणि आदर्श क्रीडा शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.
****
चंद्रपूर इथले प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्यात आली आहे. ८५ वर्षीय नागपुरे यांनी चंद्रपूर इथल्या जलतरण तलावात काल जलयोगाची प्रात्यक्षिके सादर केली. कृष्णाजी नागपुरे हे जलयोग करणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती ठरले आहेत. ३७ प्रकारच्या योगासनांचं आणि योगमुद्रांचं ३७ मिनिटात सादरीकरण करून आपलं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद केलं.
****
कचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून लातूर जिल्ह्याची राज्यात ओळख होईल असा विश्वास नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व नगर पंचायतींमध्ये जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या सूचनेनुसार कचरा विघटन प्रक्रिया सुरु झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर कोकरे बोलत होते. कोकरे यांनी प्रत्येक नगर पंचायतीत विघटन प्रक्रियेचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं आहे. औसा नगरपालिकेकडून काल घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक बंदी सप्ताह अंतर्गत दहा पथका मार्फत संपूर्ण शहरात १०० टक्के कचरा विलगीकरण करून, बसस्टॅन्ड ते कचरा डेपो पर्यंत भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली होती.
****
लेखक, कलावंतांनी सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरला पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं, संस्कार भारतीच्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्धाटन रसाळ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. भयमुक्त असा लेखक, कलावंत, विचारवंताचा वर्ग या देशामध्ये निर्माण होण्यासाठी साहित्यसंस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन डॉ.सुधीर रसाळ यांनी यावेळी केलं. भरत लोळगे यांनी अध्यक्षीय समारोपात कला व्यक्तीला सुसंस्कृत आणि परिपूर्ण करते ती व्यक्तीला क्षणिक सुख नाही तर खरी शांती आणि खरा आनंद प्रदान करत असल्याचं यावेळी म्हटलं. परिसंवाद, काव्यसंमेलन, मुलाखत असे विविध कार्यक्रम संमेलनात घेण्यात आले.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ६३९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९६ हजार ४८४ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २२४ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल १ हजार ६९८ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३६ हजार ५७६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ६७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या १३, औरंगा��ाद ११, जालना ७, बीड २ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जांबसमर्थ इथल्या मुर्ती चोरी प्रकरणी काल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे यांनी काल ग्रामस्थांशी संवाद साधला. चोरीचा तपास लवकर व्हावा यासाठी वरिष्ठ स्तरावर बोलणं झाल्याचं दानवे यांनी सांगितलं. तर विधीमंडळ अधिवेशनात हा प्रश्न तातडीनं मांडल्याचं सांगत पोलिसांना कार्यबळाचा वापर करुन प्रकरणाचा तपास करावा तसंच मंदिरासह गावात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं. एक आठवडयापूर्वी जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून ऐतिहासिक नऊ मूर्ती चोरीला गेल्या आहेत.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तावर पाच गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेल्या भारतीय संघाने पाकिस्तान संघाला २० व्या षटकात १४७ धावांवर तंबूत पाठवलं. भुवनेश कुमारनं चार, हार्दिक पंड्या तीन, अर्शदीप सिंग दोन तर अवेश खानने एक बळी घेतला. १४८ या लक्ष्याचा पाठलाग करतांना के एल राहुल शून्यावर बाद झाला. रोहित शर्मा १२, विराट कोहली ३५, रवींद्र जडेजा ३५ आणि सूर्यकुमार यादवने १८ तर हार्दिक पांड्याने १७ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक सामनावीर ठरला. भारताचा पुढचा सामना ३१ तारखेला हाँगकाँग संघासोबत होणार आहे.
****
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मानवी मूल्यांसाठी संघर्ष केला, ती मूल्य समाजाने जोपासायला हवीत, असं विधीज्ञ वैशाली डोळस यांनी म्हटलं आहे. लहुजी साळवे कर्मचारी महासंघ आणि परिवर्तन ग्रूपच्या विद्यमानं अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त काल औरंगाबाद इथं अभिवादन सभा घेण्यात आली, यावेळी केलेल्या भाषणात विधीज्ञ डोळस यांनी, अण्णाभाऊ यांच्या कार्याला उजाळा दिला.
****
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यात दीपक नगर तांडा इथं मन की बात कार्यक्रमाचं सामुहिक श्रवण केलं. ढोकी इथं भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, निहाल काझी, यांनी मन की बात कार्यक्रम ढोकी ग्रामस्थांसमवेत ऐकला.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं काल लातूर इथं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात जिल्ह्यातील जवळपास साडे तीन हजार युवकांनी सहभागी नोंदवला. यावेळी १ हजार ४४८ युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली.
****
0 notes
पुढील वर्षी त्रिपुरा निवडणुकीसाठी, भाजपचा बिग हडल चार्ट कोर्स
पुढील वर्षी त्रिपुरा निवडणुकीसाठी, भाजपचा बिग हडल चार्ट कोर्स
हिमंता बिस्वा सरमा आणि डॉ माणिक साहा (फाइल)
गुवाहाटी:
त्रिपुरामध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत, भाजप राज्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी ड्रॉईंग बोर्डवर परत येत आहे, जिथे ते चिकट विकेटवर दिसत आहे आणि काही महिन्यांपूर्वीच आपला मुख्यमंत्री बदलावा लागला आहे. आज गुवाहाटीमध्ये या योजनेवर चर्चा करण्यासाठी पक्षनेतृत्वाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे…
View On WordPress
0 notes
वधूच्या बहिणींनी त्यांच्या डान्स परफॉर्मन्सने बांधली गाठ, स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून तुमचा दिवस जाईल
वधूच्या बहिणींनी त्यांच्या डान्स परफॉर्मन्सने बांधली गाठ, स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून तुमचा दिवस जाईल
त्यांच्या लग्नात अनेकदा फक्त मित्र किंवा भाऊ-बहीणच त्यांचे खरे रंग घालतात. यामुळेच लग्नात वधू-वरांनंतर बहुतेकांची नजर याच लोकांवर असते. वधू आणि वधूचे भाऊ आणि बहिणी लग्नाच्या काही महिन्यांपूर्वीच नृत्याची तयारी करतात. यानंतर, लग्नाच्या दिवशी ते आपल्या नृत्याने पाहुण्यांची मने लुटतात.
डान्स व्हायरल व्हिडिओ
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram
भारतातील लग्नसराईचा हंगाम संपला असला तरी इंटरनेट मजा आणि…
View On WordPress
0 notes
होळी खेळून आंघोळीला बाथरूममध्ये जोडपे गेले खरे मात्र त्यानंतर..
होळी खेळून आंघोळीला बाथरूममध्ये जोडपे गेले खरे मात्र त्यानंतर..
देशात एक धक्कादायक हरियाणामधील करनाल इथे उघडकीस आली असून घरौंडा येथे एका जोडप्याचा बाथरूममध्ये श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी होळी खेळल्यानंतर हे दोघेही बाथरूमध्ये आंघोळीला गेले होते मात्र तिथे गिझरमधील गॅस लिक झाल्याने ही दुर्घटना घडली असून पती गौवर आणि पत्नी शिल्पी यांचा मृत्यू झालेला आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.
उपलब्ध माहितीनुसार, त्यांच्या घरातील…
View On WordPress
1 note
·
View note
colleges without principal: कॉलेजांचा भार 'प्रभारीं'वर! मुंबई विद्यापीठाशी संलग्न १७८ कॉलेज प्राचार्यांविना - 178 colleges affiliated to mumbai university are without principal
colleges without principal: कॉलेजांचा भार ‘प्रभारीं’वर! मुंबई विद्यापीठाशी संलग्न १७८ कॉलेज प्राचार्यांविना – 178 colleges affiliated to mumbai university are without principal
हायलाइट्स:
मुंबई विद्यापीठाशी संलग्न १७८ कॉलेजांमधील प्राचार्यांची पदे रिक्त
विनाअनुदानित, स्वायत्त कॉलेजांची संख्या अधिक
८१ कॉलेजांमध्ये संचालकाच्या हाती कार्यभार
मुंबई
उच्च शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रत्येक कॉलेजांतील प्राचार्यांची पदे भरण्याचे आदेश मागील काही महिन्यांपूर्वीच उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. असे असतानाही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या तब्बल १७८ कॉलेजांमध्ये…
View On WordPress
0 notes
"असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव चरणी लीन...!"– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - महासंवाद
“असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव चरणी लीन…!”– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – महासंवाद
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच…
View On WordPress
0 notes
Platform Tickets वरही केला जाऊ शकतो railway travel; जाणून घ्या नियम
Platform Tickets वरही केला जाऊ शकतो railway travel; जाणून घ्या नियम
दिल्ली : साधारणपणे, रेल्वेने प्रवास करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आरक्षण केले जाते. आरक्षणासाठी tickets बुक करण्याचे दोन मार्ग आहेत. तिकीट आरक्षण खिडकीद्वारे किंवा ऑनलाईनद्वारे बुकिंग करता येते. परंतु जर एखाद्याला अचानक प्रवास करावा लागला तर बहुतेक लोक तात्काळ तिकिटांना एकमेव पर्याय मानतात. पण Platform Tickets असले तरी railway travel केला जावू शकतो, याची माहिती अनेक प्रवाशांना नसते. हे पूर्णपणे…
View On WordPress
0 notes
एकतर्फी प्रेमातून प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रियसी तरुणीला मारली मिठी…
एकतर्फी प्रेमातून प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रियसी तरुणीला मारली मिठी…
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दी. 22 नोव्हेंबर :- जिंतूर तालुक्यातील दाभादिग्रस या छोट्याशा गावातून आलेला गजानन खुशाल मुंडे (३०) पीएचडी करत होता. विद्यापीठ वसतिगृहात राहायचा. गावातील सर्वात हुशार मुलगा. कुटुंबीयांनी पोटाला चिमटा देऊन शिकायला शहरात पाठवले. सहा महिन्यांपूर्वीच स्पोर्ट्स बाइक घेऊन घेऊन दिली. आपला मुलगा ‘डॉक्टर’ होऊन चांगली नोकरी करेल, घराण्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी स्वप्ने शेतकरी…
View On WordPress
0 notes
सोनम कपूरने डिलिव्हरीनंतर 3 महिन्यात घटवलं वजन, फिट ऍण्ड स्लिमकरता 'ही' एक गोष्ट ठरली भारी
सोनम कपूरने डिलिव्हरीनंतर 3 महिन्यात घटवलं वजन, फिट ऍण्ड स्लिमकरता ‘ही’ एक गोष्ट ठरली भारी
सोनम कपूरने डिलिव्हरीनंतर 3 महिन्यात घटवलं वजन, फिट ऍण्ड स्लिमकरता ‘ही’ एक गोष्ट ठरली भारी
सोनम कपूरने काही महिन्यांपूर्वीच मुलगा ‘वायु’ ला जन्म दिला आहे. गरोदरपणात प्रत्येक महिलेचं कमी-अधिक प्रमाणात वजन वाढतं. सोनम कपूरच देखील वजन वाढलं होतं. सोनमने वायुला ऑगस्ट महिन्यात जन्म दिला. मात्र आता जेव्हा ती मीडियासमोर आली तेव्हा तिचा फरक जाणवेल इतका वेट लॉस झाला आहे. सोनम कपूरने प्रेग्नेंसीनंतरचे वजन…
View On WordPress
0 notes
देशात व्हीएलसी मीडिया प्लेअरवर बंदी
नवी दिल्ली : भारतात व्हीएलसी मीडिया प्लेअर अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारकडून व्हीएलसीअॅपवर बंदी घालण्यात आली आहे. हे अॅप युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप होत होता असे काही मीडिया रिपोर्टमध्ये बोलले जात आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने या अॅपवर बंदी आणली आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअर सारख्या साईटवरून हटवण्यात आले आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने आयटी कायदा २००० अंतर्गत व्हीएलसी मीडिया प्लेयर आणि व्हीएलसी प्रोजेक्टच्या वेबसाइटवर बंदी घातली आहे. व्हीएलसी मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण व्हीएलसी प्लेअरची वेबसाइट डाउन आहे आणि डाउनलोड लिंकदेखील ब्लॉक करण्यात आल्या आहेत. व्हीएलसी मीडिया प्लेअरची वेबसाईट ओपन केल्यावर आय अॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.
काय आहे कारण?
व्हीएलसी मीडिया प्लेअर प्रोजेक्ट अंतर्गत फ्रान्समध्ये तयार करण्यात आलेले अॅप आहे. भारत सरकारने या अॅपवर बंदी घातली आहे. त्यामुळे हे अॅप आता भारतात वापरता येणार नाही. एसीटी फायबरनेट, व्हीआय यासारख्या इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांवरूनही हटविण्यात आले आहे. याआधी भारत सरकारने चीनी अॅपवर बंदी घातली होती.
Read the full article
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१० ****
· तृणधान्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन.
· नाशिक इथं तोफखाना क्षेत्रात संशयास्पद ड्रोन प्रकरणी गुन्हा दाखल.
· परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात राख जमा करण्यासाठी स्फोटकं वापरण्याच्या तयारीत असलेले तीन जण ताब्यात.
· औरंगाबाद इथं नियोजित क्रीडा विद्यापीठाचं लवकरच भूमिपूजन-सहकार मंत्री अतुल सावे.
आणि
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी भारताची पाकिस्तानशी लढत.
****
देशातील जनतेमध्ये तृणधान्या विषयी जागरूकता वाढवण्याची गरज असून, त्यासाठी लोकचळवळ उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या ९२ व्या भागात जनतेशी संवाद साधत होते. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश असून, देशाच्या विविध भागातल्या अन्नात तृणधान्यांचे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे, कोडो, कुटकी, कुट्टू, असे विविध प्रकार पाहायला मिळतात, याकडे लक्ष वेधताना, ऊर्जा तसंच जीवनसत्वांनी परिपूर्ण तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी उपयोगी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. कमी पाण्यात उत्पादन होणाऱ्या तृणधान्यांच्या आरोग्य विषयक विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख करत, शेतकऱ्यांनी तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. तृणधान्यावर प्रक्रिया उद्योग उभारलेल्या स्टार्ट-अपस्चं पंतप्रधानांनी कौतुक केलं.
आगामी सणासुदीच्या काळात तृणधान्यांपासून शिजवलेल्या पक्वान्नांची छायाचित्रं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दूरदर्शनवरून प्रसारित होणारी स्वराज मालिका आवर्जून पाहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केलं.
डिजिटल इंडिया, इंटरनेट सुविधा, पोषण मास, अमृत सरोवर, जल संरक्षण आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी संवाद साधला. मेजर ध्यानचंद यांची जयंती -राष्ट्रीय क्रीडा दिन, गणेशोत्सव, ओणम, जैन धर्मियांचं संवत्सर पर्व, या निमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
गुजरातमध्ये भूज इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या भूकंप संग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. ‘स्मृतीवन’ असं या संग्रहालयाचं नाव असून संग्रहालयात भूजमधे जानेवारी २००१ मधे झालेल्या भूकंपाच्या स्मृती जतन केलेल्या आहेत.
****
नाशिकमधील प्रतिबंधित तोफखाना क्षेत्रात लष्कराच्या जवानांना काल रात्री घिरट्या घालतांना ड्रोन आढळले. यासंदर्भात प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडविल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गु���्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वीच नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील ‘नो ड्रोन फ्लाईग झोन’ घोषित करण्यात आले आहेत. त्यानंतर विना परवानगी ड्रोन आणि तेही प्रतिबंधित क्षेत्रात उडविल्याबद्दल नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
****
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखतळ्यातून राख जमा करण्यासाठी स्फोटकं वापरण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थापकाने सतर्कता दाखवत या तिघांना ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या हवाली केलं. मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी अधिक माहिती देत, यामुळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसल्याचा खुलासा केला आहे.
****
औरंगाबादमध्ये नियोजित क्रीडा विद्यापीठाचं भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचं आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगानं आज औरंगाबाद इथं जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा तिसरा जीवन गौरव पुरस्कार खो खो चे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि अर्जुन पुरस्कार विजेते नौकानयनपटू दत्तू भोकनळ यावेळी उपस्थित होते. खेळाडूंनी पायाभूत सुविधा नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करत आपलं ध्येय गाठण्याचं आवाहन भोकनळ यांनी केलं. यावेळी जिल्हाभरातील विविध राष्ट्रीय आणि आतंराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेले खेळाडू आणि आदर्श क्रीडा शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.
****
चंद्रपूर इथले प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूर इथल्या जलतरण तलावात नागपुरे यांनी आज जलयोगाची प्रात्यक्षिके सादर केली. कृष्णाजी नागपुरे हे जलयोग करणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती ठरले आहेत. ३७ प्रकारच्या योगासनांचं आणि योगमुद्रांचं ३७ मिनिटात सादरीकरण करून आपलं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद केलं.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २६ लाख ५३ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ६६ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
आरोग्य मत्रांलयानं २०१ कोटीं २१ लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत मोफत उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापैकी ६ कोटी २९ लाखांहून अधिक मात्रा शिल्लक असल्याचं मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानशी होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल. आकाशवाणीवरुन या सामन्याचं धावतं समालोचन हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रसारित होणार आहे.
****
कचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून लातूर जिल्ह्याची राज्यात ओळख होईल असा विश्वास नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व नगर पंचायतींमध्ये जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या सूचनेनुसार कचरा विघटन प्रक्रिया सुरु झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर कोकरे बोलत होते. कोकरे यांनी प्रत्येक नगर पंचायतीत विघटन प्रक्रियेचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं आहे. औसा नगरपालिकेकडून आज घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक बंदी सप्ताह अंतर्गत दहा पथका मार्फत संपूर्ण शहरात १०० टक्के कचरा विलगीकरण करून, बसस्टॅन्ड ते कचरा डेपो पर्यंत भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली
****
लेखक, कलावंतांनी सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरला पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. आज औरंगाबाद इथं, संस्कार भारतीच्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्धाटन रसाळ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. भयमुक्त असा लेखक, कलावंत, विचारवंताचा वर्ग या देशामध्ये निर्माण होण्यासाठी साहित्यसंस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन डॉ.सुधीर रसाळ यांनी यावेळी केलं. भरत लोळगे यांनी अध्यक्षीय समारोपात कला व्यक्तीला सुसंस्कृत आणि परिपूर्ण करते ती व्यक्तीला क्षणिक सुख नाही तर खरी शांती आणि खरा आनंद प्रदान करत असल्याचं यावेळी म्हटलं. परिसंवाद, काव्यसंमेलन, मुलाखत असे विविध कार्यक्रम संमेलनात घेण्यात आले.
****
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मानवी मूल्यांसाठी संघर्ष केला, ती मूल्य समाजाने जोपासायला हवीत, असं विधीज्ञ वैशाली डोळस यांनी म्हटलं आहे. लहुजी साळवे कर्मचारी महासंघ आणि परिवर्तन ग्रूपच्या विद्यमानं अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त काल औरंगाबाद इथं अभिवादन सभा घेण्यात आली, यावेळी केलेल्या भाषणात विधीज्ञ डोळस यांनी, अण्णाभाऊ यांच्या कार्याला उजाळा दिला.
****
सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असं आवाहन वीज महावितरण कंपनीनं केलं आहे. यासाठी मंडळांना घरगुती ग्राहकांप्रमाणे वीज दर आकारला जाणार आहे.
****
0 notes
अथिया शेट्टी आणि केएल राहुल जर्मनीला भेट, पाहा व्हिडिओ
अथिया शेट्टी आणि केएल राहुल जर्मनीला भेट, पाहा व्हिडिओ
बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल या जोडप्याने काही महिन्यांपूर्वीच त्यांचे नाते अधिकृत केले होते. हे जोडपे सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अथिया शेट्टी आणि केएल राहुल रविवारी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसले. मात्र, दोघांनी विमानतळाच्या टर्मिनलमध्ये एकत्र प्रवेश केला नाही किंवा एकत्र पोजही दिली नाही.
अथिया शेट्टी आणि…
View On WordPress
0 notes
प्रियकराच्या आत्महत्येनंतर प्रेयसीनेही घेतला गळफास
दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने तीन महिन्यांपूर्वीच ठरला होता विवाह
औरंगाबाद : एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे पंधरा दिवसापूर्वी विवाह ठरला होता . मात्र , प्रियकराने आत्महत्या केल्याने त्या विरहातून १७ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि .१ ९ रोजी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली .
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार खुशी रमेश कलवल ( १७ , रा . गायकवाड हौसिंग…
View On WordPress
0 notes